Ads

Friday, November 20, 2020

सर्वाधिक गुण असूनही भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर, ऑस्ट्रेलिया अव्वल

नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाचे सर्वाधिक गुण आहेत. पण सर्वाधिक गुण असूनही आयसीसीच्या नव्या नियमानुसार भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. पण या नियमाचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या संघाला चांगलाच झालेला पाहायला मिळत आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या संघाने यावेळी भारताला मागे सारून अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने आतापर्यंत तीन कसोटी मालिका खेळल्या आहेत. या तीन कसोटी मालिकांमध्ये भारताने ९ सामने खेळले आहेत. या ९ सामन्यांमध्ये भारताने सात लढतींमध्ये विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. सध्याच्या घडीला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाचे सर्वाधिक ३६० गुण आहेत. पण सर्वाधिक गुण असूनही आयसीसीच्या नव्या नियमानुसार भारतीय संघ अव्वल स्थानावर पाहायला मिळत नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत चार कसोटी मालिका खेळल्या आहेत. या चार कसोटी मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाने १० सामने खेळले आहेत. या १० लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाने सात सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. त्याचबरोबर दोन लढतींमध्ये त्यांना पराभव पत्करावे लागले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहीलेला आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचे २९६ गुण आहेत. पण भारतापेक्षा कमी गुण असूनही ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. आयसीसीचा नवा नियम आहे तरी काय...आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आता नवीन नियम बनवला आहे. या नियमांनुसार गुणांपेक्षा विजयाची टक्केवारी महत्वाची समजली जात आहे. एखाद्या संघाची विजयाची टक्केवारी जर जास्त असेल तर तो संघ आघाडीवर असेल. या नियमांनुसार ऑस्ट्रेलियचा संघ अव्वल स्थानावर असून भारतीय संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. सध्याच्या घडीला भारताची विजयाची टक्केवारी ७५.० एवढी आहे, तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही ८२.२ एवढी आहे. ऑस्ट्रेलियाचे गुण कमी असले तरी त्यांची विजयाची टक्केवारी भारतापेक्षा जास्त आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या संघाने या अजिंक्यपद स्पर्धेत भारताला मागे सारत अव्वल स्थान पटकावले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lN9CNq

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...