Ads

Saturday, November 28, 2020

IND vs AUS: दुसऱ्या वनडेत भारताला या चुका टाळाव्या लागतील; आजचा पराभव परवडणारा नाही

सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वनडे ( 2nd odi) आज होणार आहे. विराट कोहिलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी आजची लढत करो वा मरो अशी आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. सिडनी मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आज पराभव झाल्यास भारतीय संघाला मालिका गमवावी लागेल. चूका सुधाराव्या लागतील... पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना लय सापडली नाही. पण आता आजच्या लढतीत चूका सुधाराव्या लागतील आणि सर्वोत्तम अशी कामगिरी करून मालिका वाचवावी लागले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारताच्या कमकूवत बाजूंचा फायदा घेतला. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी ही काळजीचा विषय आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाचे फलंदाज शानदार फॉर्ममध्ये... ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे फलंदाज शानदार फॉर्ममध्ये आहेत. भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराह आणि अन्य गोलंदाजांची धुलाई करण्यात आली होती. भारतीय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. एखादा खेळाडू जखमी झाला तरच बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या वनडेत फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि जलद गोलंदाज नवदीप सैनी यांनी मिळून २० षटकात १७२ धावा दिल्या. दुखापतीमुळे चहल १० षटकानंतर मैदानातून बाहेर गेला. तर सैनी देखील अनफिट आहे. त्यामुळे टी. नटराजन किंवा शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर चहलच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान मिळू शकते. वाचा- विराटवर नजर... पहिल्या वनडेत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी बेजबाबदार शॉट खेळले. यातील श्रेयस अय्यरने ज्या पद्धतीने विकेट टाकली त्यावर बरीच चर्चा झाली. मयांक अग्रवाल देखील उसळत्या चेंडूव बाद झाला. आजच्या लढतीत भारताचा कर्णधार विराट कोहली याच्यावर देखील सर्वांची नजर असेल. भारतीय संघाची अडचण... पहिल्या वनडेत हार्दिक पांड्याने ७६ चेंडूत ९० धावा केल्या. पण एकाच्या जोरावर विजय मिळू शकत नाही. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत देखील असेच झाले होते. पांड्या सध्या गोलंदाजी करू शकत नाही. तो टी-२० वर्ल्डकपच्या आधी गोलंदाजी करण्याची शक्यता नाही. त्यामुळे विराट कोहलीकडे असे गोलंदाज आहेत जे फलंदाजी करू शकत नाहीत. भारताला सहाव्या गोलंदाजी कमी भासत असल्याचे कर्णधार विराट कोहलीने देखील मान्य केले. यामुळे बुमराहवर अतिरिक्त दबाव येतोय.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33rOPb0

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...