Ads

Sunday, November 15, 2020

भारतीय संघाच्या निवड समितीममध्ये आता मराठमोळा क्रिकेटपटू येण्याची शक्यता, पाहा नेमकं काय घडलं...

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरील भारतीय संघाची निवड झाली. त्यानंतर सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती चांगलीच चर्चेत आली. पण आता निवड समितीमध्ये मराठमोळा माजी आंतरराष्ट्रीय येणार असल्याचे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता भारताच्या निवड समितीमध्ये महाराष्ट्रातील खेळाडू आल्यावर आपल्याकडील खेळाडूंवर अन्याय होणार नाही, असे म्हटले जात आहे. या पदासाठी अर्ज करण्याची आजची अखेरची तारीख आहे. निवड समितीमध्ये सध्याच्या घडीला तीन पदे रिक्त आहेत. त्यासाठी बीसीसीआयने अर्जही मागवले आहेत. निवड समिती सदस्य पदासाठी आता भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने अर्ज केल्याचे समजते आहे. आगरकरबरोबर माजी क्रिकेटपटू मणिंदर सिंग आणि एस. एस. दास यांनीही अर्ज केल्याचे म्हटले जात आहे. सध्याच्या घडीला निवड समितीमध्ये सुनील जोशी आणि हरविंदर सिंग हे दोन माजी क्रिकेटपटू आहे. या समितीचे अध्यक्षपद सुनील जोशी यांच्याकडे आहे. पण निवड समितीमध्ये अजून काही सदस्यांची पदे रीक्त आहेत. यासाठी बीसीसाआयने माजी क्रिकेटपटूंकडून अर्ज मागवले आहेत. त्यानुसार आगरकर, मणिंदर आणि दास यांनी अर्ज केल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्माही या शर्यतीमध्ये आहेत, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता आगामी निवड समितीमध्ये नेमकी कोणाला संधी मिळते आणि त्यानंतर संघ निवडीमध्ये काही बदल होतो का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. आगरकर आणि मणिंदर यांनी गेल्यावेळीही निवड समितीमधील पदासाठी अर्ज केला होता. त्यावेळी या दोघांचा विचार करण्यात आला नव्हता. पण या दोघांनी यावर्षी पुन्हा एकदा अर्ज केल्याचे समजत आहे. त्याचबरोबर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही आगरकरने अर्ज केल्याचे खासगीत सांगितल्याचे समजत आहे. पण जोपर्यंत बीसीसीआय याबाबत स्पष्टपणे आपली भूमिका मांडत नाही, तोपर्यंत या गोष्टी स्पष्ट होणार नाहीत. त्यामुळे बीसीसीआय या गोष्टीवर आता कधी पहिले वक्तव्य करते आणि माहिती देते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ppL5jH

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...