Ads

Thursday, November 19, 2020

IND v AUS: 'ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतीय संघाला त्यांचा फलंदाजीच्या क्रमाबाबत समस्या'

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना कसोटा मालिकेत भारतीय संघाला त्यांचा फलंदाजीच्या क्रमाबाबत समस्या नक्कीच जाणवेल. कारण कोहली तीन कसोटी सामने खेळणार नाही, त्याची जागा कोण घेणार आणि भारतीय संघासाठी सलामी कोण करणार, हे महत्वाचे प्रश्न भारतीय संघापुढे असतील, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले आहे. कोहली हा ऑस्ट्रेलियामध्ये फक्त एकच कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे पुढील तीन कसोटी सामन्यांमध्ये कोहली हा भारतीय संघाचा भाग नसेल. त्यावेळी अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व येऊ शकते, पण कोहलीच्या जागी फलंदाजीला नेमका कोणता खेळाडू येणार, याचे उत्तर मात्र भारतीय संघाला शोधावे लागणार आहे. याबाबत पॉन्टिंग म्हणाला की, " कोहली तीन कसोटी सामने खेळणार नाही. त्यामुळे भारतीय संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे येऊ शकते. त्यामुळे अजिंक्यवर अधिक दडपण आलेले असेल. त्याचबरोबर कोहलीच्या चौथ्या क्रमांकावर कोणत्या फलंदाजाला संधी द्यायची, हा मोठा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. त्याचबरोबर भारतीय संघाच्या डावाची सुरुवात नेमके कोण दोन सलामीवीर करणार, याचे उत्तरही सध्याच्या घडीला भारतीय संघाकडे दिसत नाही. त्यामुळे कसोटी मालिकेत भारतीय संघापुढे बऱ्याच समस्या असतील. या समस्या त्यांनी सोडवल्या नाहीत तर सर्व काही कठिण होऊ शकते." पॉन्टिंग पुढे म्हणाला की, " सध्याच्या घडीला भारतीय संघापुढे बरेच प्रश्न पडलेले आहेत. फलंदाजीचा तर त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. पण त्याचबरोबर गोलंदाजीमध्येही त्यांना काही समस्या सोडवाव्या लागतील. कारण गोलंदाजीमध्ये नेमकी संधी कोणाला द्यायचीय, या प्रश्नाचे उत्तर त्यांना सोडवावे लागेल. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा हे दोन वेगवान गोलंदाज संघात आहेत. त्याचबरोबर इशांत शर्मा फिट झाला तर त्याला संधी द्यायची की उमेश यादवला खेळवायचे, हा प्रश्नदेखील त्यांना सोडवावा लागणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघात नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराजसारखे युवा वेगवान गोलंदाजही आहेत, त्यांना कधी द्यायची हेदेखील भारतीय संघाला ठरवावे लागणार आहे. त्याचबरोबर जर फिरकीपटूला संघात स्थान द्यायचे असेल तर कोणत्या फिरकीपटूला संधी द्यायली, हादेखील भारतीय संघापुढे मोठा प्रश्न असेल."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2IU3mVE

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...