नवी दिल्ली : भारतातील एका नेत्याने भारताचा कर्णधार आणि त्याची पत्नी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचे आज पाहायला मिळाले आहे. विराट कोहली हा तर अनुष्काचा पाळीव प्राणी आहे, असे ट्विट एका नेत्याने आज केले आहे. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापलेले पाहायाला मिळत आहे. कॉंग्रेसचे नेते डॉ. उदित राज यांनी आज एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये उदित यांनी लिहिले आहे की, " अनुष्का, तु आपल्या श्वानाला म्हणजे विराट कोहलीला पाळण्याची गरज नाही. श्वानापेक्षा जास्त प्रमाणिक कोणीही नाही. कोहली तु, मुर्ख लोकांना प्रदुषणामुळे मानव जातीला धोका आहे, असे तु शिकवायला गेलास. तुमच्या सारख्या लोकांचा डीएनए एकदा तरी तपासला पाहिजे. कारण तुम्ही या देशाचे मूळ नागरिक आहात की नाही, हे आम्हाला समजू शकेल." या ट्विटनंतर उदित राज हे ट्रोल व्हायला लागले आणि लोकांनी त्यांच्यावर कायदेशी कारवाई करावी, असेही म्हटले. त्यानंतर पुन्हा एकदा उदित राज यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये उदित राज यांनी म्हटले आहे की, " विराटने दिलेल्या सल्ल्याचे स्वागत, पण ट्विटरवर आता अपशब्द वापरायला सुरुवात झाली आहे. मी हैराण आहे की, सरकार हे सर्व पाहते आहे की नाही, की मौनव्रत धारण करून या सर्व गोष्टींना सरकार सहमती देत आहे. या लोकांविरुद्ध आतापर्यंत कारवाई झालेली नाही. ही माणसंच असू शकत नाहीत. श्वानापेक्षा जास्त प्रमाणित कोणीच नाही." नेमकं घडले तरी काय, पाहा... विराट कोहलीने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये कोहली म्हणाला होता की, " आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करायला हवे. त्यामुळे यावर्षी दिवाळीमध्ये तुम्ही फटाके फोडू नका. त्याचबरोबर दिवाळी घरी दिवे लावून साजरी करा. आपल्या जवळच्या व्यक्तींना मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड करा." पण यानंतर कोहली चांगलाच ट्रोल व्हायला लागला होता. त्यानंतर उदित राज यांनी त्याच्यावर जहरी टीका केली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nv4j5p
No comments:
Post a Comment