नवी दिल्ली : भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाचा वाद साऱ्यांनी पाहिला आहे. रोहित शर्माला संघात स्थान न देताला लोकेश राहुलकडे वनडे आणि ट्वेन्टी-२० संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले. पण आता भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडून काढून रोहित शर्माकडे द्यायला हवे, अशी जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे. रोहितला भारतीय संघाचे कर्णधारपद कधी मिळणार, अशी उत्सुकता चाहत्यांना आहे. याबाबत इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन यांनी सांगितले की, " रोहित हा ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सध्याच्या घडीला सर्वोत्तम कर्णधार आहे. ही गोष्ट कोणाही सांगायला नको. कारण रोहितने जे विक्रम रचले आहेत त्यामुळे या गोष्टी सर्वांपुढे आलेल्या आहेत. त्यामुळे त्यामुळे आता विराट कोहलीकडून ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद काढून रोहित शर्माकडे देण्याची हीच योग्य वेळ आहे." आयपीएलमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत पाच जेतेपदे पटकावली आहेत. एकाही कर्णधाराला आतापर्यंत ही गोष्ट जमलेली नाही. रोहितकडे २०१३ साली मुंबई इंडियन्सच्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्यानंतर गेल्या सात वर्षांमध्येच रोहितने आपल्या नेतृत्वाखाली संघाला तब्बल पाच जेतेपदे जिंकवून दिली आहेत. त्यामुळेच रोहित आता ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच भारतीय संघाचे कर्णधारपदही आता रोहितकडे द्यायला हवे, अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आता कोहलीकडून भारतीय ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद रोहितला कधी मिळणार, याची उत्सुकता जगभरातील चाहत्यांना नक्कीच असेल. रोहितबाबत हुसेन यांनी पुढे म्हटले आहे की, " रोहित हा एक शांत व्यक्ती आहे. त्यामुळे मैदातानतही तो शांत असतो. शांत असल्यामुळेच रोहिला योग्य निर्णय घेता येतात. त्यामुळेच रोहितला हे यश मिळाले आहे. रोहित हा बऱ्याच कालावधीपासून भारतीय संघाबरोबर आहे. त्यामुळे त्याला खेळाडंचीही चांगली जाण आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वातील बऱ्याच खेळाडूंना रोहितला आता भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद द्यावे, असे वाटत आहे. त्यामुळे रोहितला कर्णधारपद सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला तरी वाटते."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3f2YTLX
No comments:
Post a Comment