नवी दिल्ली: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी-२० मालिकेनंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ४ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या कसोटी मालिकेत अनेक विक्रम होण्याची शक्यता आहे. यातील एक महत्त्वाचा विक्रम जो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, तो कोण मोडणार यावर सर्वांची नजर असेल... वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीत सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतक केली आहेत. सध्या दोन्ही संघातील खेळाडूंचा विचार करता भारताचा कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार यांनी प्रत्येकी ७ शतक केली आहेत. यात कोहलीकडे सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी असेल. कारण तो चार सामन्यातील फक्त एकच कसोटी सामना खेळणारा आहे. वाचा- या दोन्ही संघातील खेळाडूंचा विचार केल्यास विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथसह मायकल क्लार्क संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. विराट एकच सामना खेळणार असून तर दुसऱ्या बाजूला स्मिथ पूर्ण मालिका खेळणार आहे. जर विराटने दोन डावात दोन शतक केली तर तो सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करेल. स्मिथला मात्र चार कसोटी सामन्यातील आठ डाव आहेत. त्यामुळे त्याच्याकडे सचिनचा विक्रम मोडण्याची अधिक संधी आहे. वाचा- बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने १९ सामन्यातील ३४ डावात १ हजार ६०४ धावा केल्या आहेत. यात ७ शतकांचा समावेश आहे. तर स्मिथने १० सामन्यातील २० डावात १ हजार ४२९ धावा केल्यात. यात विराट इतकीच म्हणजे ७ शतक देखील आहेत. वाचा- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३४ सामन्यातील ६५ डावात ३ हजार २६२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ९ शतक आणि १८ अर्धशतक आहेत. सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतक आणि सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत सचिन सध्या अव्वल स्थानी आहे. या यादीत सचिननंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा नंबर येतो. त्याने २९ सामन्यातील ५१ डावात चार वेळा नाबाद राहत २ हजार ५५५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ८ शतक आणि १२ अर्धशतक आहेत. धावा आणि शतकांच्या विक्रमात तो दुसऱ्या स्थानावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pGd2DJ
No comments:
Post a Comment