Ads

Saturday, November 14, 2020

'भारताच्या प्रतिभावान खेळाडूंना IPL मध्ये जागा मिळत नाही'

नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता पुढील म्हणजेच २०२१ साली होणाऱ्या स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. पुढील वर्षी आयपीएलमध्ये आठ पेक्षा अधिक संघ पाहायला मिळतील अशी चर्चा आहे. यासंदर्भात भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने एक महत्त्वाचे विधान केले आहे. वाचा- भारताचा माजी खेळाडू आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेले राहुल द्रवीड यांनी आयपीएलमध्ये भारतीय युवा खेळाडूंना पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये संघ वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ज्या ठिकाणाहून मी पाहत आहे. त्यानुसार भारतात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. पण मला वाटते की आता आयपीएलचा विस्तार करण्याची गरज आहे. संघ वाढवण्याबाबत मी सांगू शकत नाही. मात्र या संघांसाठी लागणारे खेळाडू आपल्याकडे आहेत. वाचा- देशातील विविध भागातून अनेक चांगले खेळाडू समोर येत आहेत. पण त्यांना अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळत नाही. भारतात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना संधी मिळत नाहीय. हे असे खेळाडू असतात ज्यांना खरच अंतिम ११ जणांच्यात जागा मिळायला हवी पण प्रत्यक्षात ती मिळत नाही. भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेल्या पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांना राहुल द्रविडचे मार्गदर्शन लाभले आहे. भारताच्या अ आणि १९ वर्षाखालील संघाला राहुल द्रविडने मार्गदर्शन केले आहे. या सर्व खेळाडूंना घडवण्यामागे राहुलची मोठी भूमिका आहे. वाचा- मी १९ वर्षाखालील संघा सोबत बरेच दिवस होतो. या खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. पण असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी अद्याप संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये संघ वाढवण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पुढील वर्षी आठ ऐवजी ९ संघांना संधी दिली जाईल तर २०२३ पर्यंत ही संख्या १० करण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची ही दिर्घकालिन योजना आहे. वाचा- राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक असेलल्या मनोज बडाले यांच्या ए न्यू इनिंग्स या पुस्तकाच्या ऑनलाइन प्रकाशन कार्यक्रमात बोलत होता. २०२१ मध्ये ९ संघ नक्कीच खेळू शकतात. यासाठी तुम्हाला डबर हेडरची संख्या वाढवावी लागले आणि स्पर्धेचा स्तर कायम ठेवला पाहिजे. आयपीएलच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळता त्याचा अनुभव मिळत असल्याचे त्याने सांगितले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38IvIwU

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...