मेलबर्न: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरूवात होत आहे. भारतीय संघ तीन टी-२०, तीन वनडे आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. युएईमध्ये आयपीएलचा १३वा हंगाम पार पडल्यानंतर भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला. वाचा- भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यानंतर सुट्टी घेणार आहे. तो पत्नी अनुष्कासाठी भारतात येणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या घरी बाळ येणार आहे. विराटच्या या सुट्टीमुळे भारतीय संघावर परिणाम होईल असे मत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक यांनी व्यक्त केले. वाचा- विराटसाठी कुटुंब हे पहिली प्राथमिकता आहे. त्याचा आदर आणि सन्मानच करतो. मी माझ्या आयुष्यात जितके खेळाडू पाहिले आहेत. त्यामध्ये विराट कोहली सर्वश्रेष्ठ आहे. त्याची अनेक कारणे आहेत. फक्त फलंदाजीमुळे मी असे म्हणत नाही. त्याची उर्जा, खेळासाठीची आवड आणि क्षेत्ररक्षणाचा समावेश आहे. वाचा- तो मैदानावर जे काही करतो त्यामध्ये संपूर्ण ऊर्जा ओततो ही एक अविश्वसनिय गोष्टी आहे. ज्या पद्धतीने विराटने बाळाच्या जन्मासाठी भारतात जाण्याचा निर्णय घेतला आहे, मी त्याचा खुप सन्मान करोत. तो देखील आपल्यासारखा साधारण व्यक्ती आहे. या निमित्ताने मला सर्व खेळाडूंना एक सल्ला द्यावा वाटतो. पहिल्या मुलाच्या जन्मावेळी नेहमी पत्नी सोबत राहा. तुमच्यासाठी ते सर्वात चांगले काम असते. वाचा- विराट कोहली नसल्याचा निश्चितपणे टीम इंडियावर परिणाम होईल. गेल्या वेळी भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, असे लँगर म्हणाले. वाचा- असा आहे वनडे मालिका १) पहिली वनडे- २७ नोव्हेंबर, सिडनी २) दुसरी वनडे- २९ नोव्हेंबर, सिडनी ३) तिसरी वनडे- २ डिसेंबर, मानकुआ ओव्हल टी-२० मालिका १) पहिली टी-२०: ४ डिसेंबर, मानकुआ ओव्हल २) दुसरी टी-२०: ६ डिसेंबर, सिडनी ३) तिसरी टी-२०: ८ डिसेंबर, सिडनी सराव लढती ६ ते ८ डिसेंबर- सराव सामना, ड्रमोनी ओव्हल, सिडन ११-१३ डिसेंबर- सराव सामना (डे-नाइड), सिडनी कसोटी मालिका १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36AZWim
No comments:
Post a Comment