Ads

Tuesday, November 17, 2020

विराट कोहलीला ट्रोल करणारे वादग्रस्त ट्वीट सूर्यकुमार यादवने लाइक केले आणि...

मुंबई: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सूर्यकुमार यादवने या वर्षी शानदार कामगिरी केली. नुकताच संपलेला आयपीएलच्या १३व्या हंगाम सुरू असताना भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची निवड झाली. या संघात सूर्यकुमार यादवची निवड होईल असे वाटले होते. पण त्याची निवड झाली नाही. सूर्यकुमारची निवड न झाल्याने अनेक माजी खेळाडूंनी आक्षेप नोंदवला होता. सोशल मीडियावर देखील यावर बरीच चर्चा झाली होती. युझर्सनी आणि कोच रवी शास्त्री यांना ट्रोल केले होते. वाचा- भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतर आयपीएलमधील सामन्यात सूर्यकुमार यादवने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू विरुद्ध धमाकेदार खेळी केली होती. या सामन्यात विराट कोहील आणि यांच्यात एक घटना घडली होती. सूर्यकुमारने ४३ चेंडूत ७९ धावा केल्या होत्या आणि मुंबई इंडियन्सला विजय मिळून दिला होता. भारतीय संघात निवड न झाल्यानंतरच्या सामन्यात त्याने ही खेळी केल्याने सर्वांनी सूर्यकुमारची निवड न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. स्वत: सूर्यकुमारने याबद्दल नाराजी बोलून दाखवली होती. वाचा- आरसीबी विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने मारलेला चेंडू विराटच्या हातात गेला होता. त्यानंतर तो सूर्यकुमारकडे चालत आला आणि त्याच्या मागे येवून थांबला होता. या घटनेवर अनेकांनी विराट कोहलीला ट्रोल केले होते. अनेक युझर्सनी विराट कोहलीवर मीम तयार केले होते. अशाच एका मीमला सूर्यकुमार यादवने लाइक केल्याने तो चर्चेत आला होता. पण काही वेळाने सूर्यकुमारने विराट कोहलीला ट्रोल करणाऱ्या ट्वीटला अनलाइक केले. पण तोपर्यंत सोशल मीडियावर ही गोष्ट अनेकांच्या लक्षात आली होती. या मीममध्ये रोहित शर्मा ज्याला प्रथम ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात घेतले नव्हते तो बीसीसीआयची निवड समिती आणि विराट कोहली तसेच अन्य लोकांशी लढताना दाखवले होते. विराट आणि सूर्यकुमार यादव यांच्यात मैदानावर झालेल्या घटनेवर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. नंतर मुंबईने फायनलमध्ये दि्लली कॅपिटल्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवले. या विजेतेपदानंतर रोहित शर्माला भारतीय संघाच्या टी-२०चे कर्णधार करण्याची मागणी गौतम गंभीर आणि मायकल वॉर्न यांनी केली होती. रोहितला जर भारतीय संघाचे कर्णधार केले नाही तर त्यामुळे टीम इंडियाचे नुकसान होणार असल्याचे गंभीर म्हणाला होता. कपिल देव आणि आकाश चोप्रा यांनी मात्र कोहलीच कर्णधार म्हणून योग्य असल्याचे म्हटले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lIsiOc

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...