अहमदाबाद, : भारताला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय संघाकडून पाच मोठ्या चुका झाल्या आणि त्याच त्यांना भारी पडल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यासाठी भारताची संघ निवड चुकली. कारण रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना संधी न देणे हे भारतीय संघाला चांगलेच भोवले. कारण रोहित संघाबरोबर होता आणि चांगली फलंदाजी करत होता. त्यामुळे फॉर्मात असलेल्या रोहित शर्माला यावेळी संधी द्यायला हवी होती. कारण शिखर धवन आणि लोकेश राहुल हे दोघेही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळत नव्हते. त्यामुळे यावेळी रोहितला संधी देऊन लोकेश राहुलला विश्रांती द्यायला हवी होती. कारण संघात रिषभ पंतची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे राहुल यष्टीरक्षणही करणार नव्हता. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवलाही आजच्या सामन्यात पदार्पणाची संधी द्यायला हवी होती. या सामन्यात भारताचे पहिले तिन्ही फलंदाज सपशेल अपयशी ठरले. कर्णधार विराट कोहलीला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्याचबरोबर राहुलला १ आणि शिखर धवनला ४ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताची सामन्याच्या सुरुवातीलाच ३ बाद २० अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे भारतासाठी सामन्याच्या सुरुवातीलाच हे मोठे धक्के बसले आणि त्यामधून ते सावरु शकले नाहीत. भारताने इंग्लंडपुढे १२५ धावांचे माफक आव्हान ठेवले असले तरी अक्षर पटेलने पहिले षटक चांगले टाकत फक्त तीन धावा दिल्या होत्या. त्यानंतर भुवनेश्वर कुमारनेही यावेळी चांगली गोलंदाजी केली होती. पण कर्णधार विराट कोहलीने त्यानंतर तिसरे किंवा चौथे षटक दिले नाही. त्यामुळे इंग्लंडच्या सलामीवीरांनी यावेळी तिसऱ्या आणि चौथ्या षटकात मोठी फटकेबाजी करत सामना आपल्या बाजूने वळवला. कोहलीला या सामन्यात उत्तम नेतृत्व करता आले नाही, हेदेखील भारताच्या पराजयाचे मोठे कारण ठरले. कारण कोहलीने संघात घेतलेल्या तीन फिरकीपटूंना योग्यपद्धतीने यावेळी वापरले नाही. युजवेंद्र चहलला कोहलीने चांगले व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला, पण त्यानेच सर्वाधिक धावा दिल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर कोहलीने यावेळी चांगले क्षेत्ररक्षणही लावले नसल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने यावेळी गोलंदाजांचा चांगला वापर केला नसल्याचे पाहायला मिळाले. कारण भुवनेश्वरने पहिले षटक चांगले टाकूनही त्याला जास्त गोलंदाजी देण्यात आली नाही. भुवनेश्वरकडे चांगला अनुभव असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दुसरीकडे कोहलीने अन्य गोलंदाजांचाही चांगला वापर केला नसल्याचे पाहायला मिळाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NcGSBD
No comments:
Post a Comment