Ads

Friday, March 26, 2021

IND vs ENG : इंग्लंडने धडाकेबाज फलंदाजी करत केली धुलाई, भारताला पराभवाचा धक्का

पुणे, : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर ६ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. भारताने विजयासाठी इंग्लंडपुढे विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान ठेवले होते. जॉनी बेअरस्टोने यावेळी शतक झळकावत भारताच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली आणि संघाला सहजपणे विजय मिळवून दिला. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी आणि जेसन रॉय यांनी ११० धावांची सलामी देत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. जेसनने सुरुवातीपासून भारताच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. त्यावेळी जॉनी हा संयतपणे फलंदाजी करत होता. पण यावेळी या दोघांकडून एक चुक झाली आणि चोरटी धाव घेण्याच्या नादात जेसन यावेळी बाद झाला. रोहित शर्माने यावेळी अप्रितम फलंदाजी करत जेसनला बाद केले. जेसनने यावेळी सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली. जेसन बाद झाल्यावर जॉनी आक्रमकपणे फलंदाजी करायला लागला. जॉनीने यावेळी उत्तुंग षटकार खेचत आपले शतक साकारले. शतक झळकावल्यावरही जॉनी आक्रमकपणे फलंदाजी करत राहीला. जॉनीला यावेळी बेन स्टोक्सची चांगली साथ मिळाली. बेन स्टोक्सही यावेळी शतक झळकावेल, असे वाटत होते. पण यावेळी फक्त एका धावेने स्टोक्सचे शतक हुकले. स्टोक्सने यावेळी ५२ चेंडूंत ४ चौकार आणि १० षटकारांच्या जोरावर तुफानी ९९ धावांची खेळी साकारली. जॉनी आणि बेन यांनी यावेळी दुसऱ्या विकेटसाठी १७५ धावांची मोलाची भागीदारी रचली. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३३६ धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कारण गेल्या सामन्यात ९८ धावांची खेळी साकारणारा शखर धवन यावेळी फक्त चार धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मालाही २५ धावांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी भारताची २ बाद ३७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतरही भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी दमदार खेळी साकारली. लोकेश राहुलने यावेळी शतक झळकावले, तर विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी यावेळी अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर अखेरच्या १० षटकांमध्ये भारतीय संघाने तब्बल १२६ धावा फटकावल्या आणि त्यामुळेच भारतीय संघाला ३३६ धावांचा डोंगर उभारता आला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lVUL43

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...