Ads

Friday, March 12, 2021

IND vs ENG : पहिल्याच सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव, इंग्लंडने केली चंपी

अहमदाबाद, 1st t-20 match : पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली, पण श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला इंग्लंडने १२५ धावांचे आव्हान ठेवता आले होते. पण इंग्लंडने दमदार सलामीच्या जोरावर हे आव्हान लिलया पेलले आणि आठ विकेट्स राखून विजय साकारला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भेदक गोलंदाजी केल्यानंतर धमाकेदार फलंदाजी केली आणि पहिल्या सामन्यात सहजपणे विजय मिळवला. भारताच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या पॉवर प्लेमध्ये अर्धशतक झळकावत झोकात सुरुवात केली. पण त्यांना पहिल्या पॉवर प्ले नंतर पहिला धक्का बसला. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने यावेळी इंग्लंडच्या जोस बटलरला बाद केले. बटलरने यावेळी २८ धावांचे योगदान दिले. बटलर बाद झाला असला तरी जेसन रॉय मात्र भारताच्या गोलंदाजांचा चांगालाच समाचार घेत असल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडने यावेळी नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. इंग्लंडचा हा निर्णय सुरुवातीला योग्य असल्याचेच दिसत होते. कारण भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात लोकेश राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. जोफ्रा आर्चरने राहुलला यावेळी बाद केले, राहुलला यावेळी फक्त एकच धाव काढता आली. राहुल बाद झाल्यावर भारतीय संघाला कर्णधार विराट कोहलीच्या रुपात मोठा धक्का बसला. कारण तिसऱ्या षटकात इंग्लंडच्या आदिल रशिदने कोहलीला बाद केले, यावेळी कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. कोहली २०१८ जूनपासून पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० सामन्यात शून्यावर बाद झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. कोहली शून्यावर बाद झाल्यावर भारताचा लवकरच तिसरा धक्काही बसला. सलामीवीर शिखर धवन यावेळी पाचव्या षटकात बाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. मार्क वुडने यावेळी धवनला बाद केले आणि त्यावेळी भारताची अवस्था ३ बाद २० अशी झाली होती. पण त्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. भारताच्या ३ बाद २० या धावसंख्येनंतर पंत आणि श्रेयस यांनी काही चांगले फटके मारले. पण यावेळी पंतला मोठी खेळी साकारता आली नाही. कारण पंतला यावेळी २१ धावांवरच समाधान मानावे लागले. पंतने यावेळी २३ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २१ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cnhyBr

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...