Ads

Tuesday, March 23, 2021

IND vs ENG : अर्धशतक झळकावल्यावर मैदानातच का रडायला लागला कृणाल पंड्या, जाणून घ्या कारण...

पुणे, : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताच्या कृणाल पंड्याने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. पण हे अर्धशतक झळकावल्यावर कृणाल मैदानातच रडायला लागल्याचे पाहायला मिळाले. कृणाल अर्धशतकानंतर एवढा का भावुक झाला होता, याचे कारण आता समोर आले आहे. भारताचा अष्टपैलू कृणालने अर्धशतक झळकावले तेव्हा तो भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण वडिलांच्या निधनानंतर तो पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. कृणालच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा तो सय्यद मुश्ताक अली करंडक खेळत होता आणि बडोद्याच्या संघाचे नेतृत्व करत होता. पण वडिलांच्या निधनामुळे त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती आणि बायो-बबलसोडून घरी जावे लागले होते. आपल्या मुलांनी भारताचे प्रतिनिधीत्व करावे, ही पंड्या बंधूंच्या वडिलांची इच्छा होती आणि ते या दोघांना नेहमीच पाठिंबा देत होते. वडिल गेल्यानंतर कृणालला पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची आज संधी मिळाली. या संधीचे सोने करत कृणालने सर्वात जलद पदार्पण करताना अर्धशतक झळकावले. हे अर्धशतक झळकावल्यावर वडिलांची आठवण झाल्यामुळे कृणाल भावुक झाला आणि मैदानातच रडायला लागल्याचे म्हटले जात आहे. कृणालने जेव्हा आपले अर्धशतक पूर्ण केले तेव्हा आकाशाकडे पाहत तो रडायला लागला. त्यावेळी कृणालचा भाऊ हार्दिकही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात कृणालने ३१ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ५८ धावांची खेळी साकारली. कृणाल आणि हार्दिक या सामन्यात कसे भावुक झाले होते, त्याचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. भारताची ४१व्या षटकात ५ बाद २०५ अशी अवस्था असताना कृणाल फलंदाजीला आला. त्यावेळी भारतीय संघ तिनशे धावांचा टप्पा ओलांडणार की नाही, याबाबत संभ्रम होता. पण कृणाल फलंदाजीला आला आणि त्याने इंग्लंडच्या गोलंदाजीवर चौफेर हल्ला चढवला. इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना कृणालने २६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. आतापर्यंत पदार्पण करताना कोणत्याही खेळाडूला एवढ्या कमी चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे कृणालच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tMEX6h

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...