Ads

Tuesday, March 23, 2021

फालतू प्रतिक्रिया देऊ नको, धोनीप्रमाणे शांत रहा; मांजरेकरांनी विराटला अंगावर घेतले

पुणे: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत खेळाडूंच्या खराब कामगिरीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिलेले उत्तर चर्चेत आले आहे. करिअरच्या पहिल्या दिवसापासून ते अखेरच्या दिवसापर्यंत या सर्व बाहेरच्या गोष्टी माझ्यासाठी फालतू आहेत. एका खेळाडूबद्दल कोण, काय बोलते आणि त्यामागे काय हेतू असतो अशा गोष्टी बाहेर राहिल्या तर चांगल्या आहेत. भविष्यात देखील आम्हाला अशा गोष्टी संघात आणायच्या नाहीत. विराटच्या या उत्तरावर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक यांनी विराटला एक सल्ला दिला आहे. वाचा- विराटने लोकांच्या प्रतिक्रियांना फालतू म्हणण्याचे टाळावे. विराटने संभाळून प्रतिक्रिया द्यावी, असे मांजरेकर म्हणाले. पहिल्या वनडेच्या आधी पत्रकार परिषदेत केएल राहुलच्या फॉर्मबद्दल विचारले असते विराटने बाहेर होणाऱ्या चर्चांना फालतू असे म्हटले होते. मांजरेकरांनी विराटच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. लोकांची मते हा भारतीय क्रिकेटचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचा सन्मान केला पाहिजे. विराटने ज्याचा उल्लेख फालतूच्या गोष्टी अशा केल्या आहेत. खर तर त्या कोणत्याही खेळाडूच्या कामगिरीवरील लोकांची मते आहेत. वाचा- बाहेरच्या गोष्टींना फालतू म्हणत आहे. प्रत्यक्षात विराट सार्वजनिक कामगिरीवर लोकांची प्रतिक्रिया आहे आणि ती नेहमी अशीच असते. जेव्हा तुम्ही चांगले खेळता तेव्हा कौतुक केले जाते आणि खराब खेळता तेव्हा त्याच्यावर टीका होते. याबाबत मांजरेकर यांनी माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे उदाहरण देखील दिले. विराटने या सत्याला संयम आणि परिपक्वतेने स्विकारले पाहिजे. जसे धोनीने केले होते. पाहा विराट काय म्हणाला होता-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3seFtd2

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...