
पुणे, : इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना सुरु असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना भारताच्या एका खेळाडूला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले आहे. नेमकं घडलं तरी काय, पाहा...ही गोष्ट घडली ती आठव्या षटकात. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर हे आठवे षटक टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने जोरदार फटका लगावला. हा चेंडू आता सीमापार जाणार आणि इंग्लंडला चार धावा मिळणार, असे दिसत होते. पण त्यावेळी भारताच्या श्रेयस अय्यरने यावेळी हवेत झेप घेतली आणि चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला. अय्यरने यावेळी दमदार झेप घेत चेंडू रोखला आणि भारतासाठी दोन धावा वाचवल्या. पण यावेळी श्रेयसला गंभीर दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला थेट मैदानाबाहेर नेण्यात आले. सध्याच्या घडीला श्रेयसच्या जागी शुभमन गिलला राखील खेळाडू म्हणून मैदानात उतरवण्यात आले आहे. या मालिकेनंतर आयपीएलचा हंगाम रंगणार आहे. श्रेयसकडे दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे कर्णधारपद आहे. श्रेयसची ही दुखापत गंभीर स्वरुपाची असेल तर तो आयपीएल खेळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने अंतिम फेरीत मजल मारली होती. पण अंतिम फेरीत त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाला अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांच्या पाठोपाठ केएल राहुल आणि क्रुणाल पंड्या यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडला विजयासाठी ३१७ धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक ९८ धावा केल्या. त्याचे शतक फक्त दोन धावांनी हुकले. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघाकडून क्रुणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी पदार्पण केले. तर विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतच्या ऐवजी केएल राहुलला स्थान दिले गेले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vUYkMe
No comments:
Post a Comment