Ads

Tuesday, March 16, 2021

IND vs ENG : रोहित शर्माला तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मिळाली संधी, पाहा संघातील महत्वाचे बदल

अहमदाबाद, : रोहित शर्माला तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात संधी देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. रोहितला पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे, असे वक्तव्य कर्णधार विराट कोहलीने केले होते. त्यानुसार पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळवण्यात आले नाही. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात तो खेळणार का, याची उत्सुकता सर्वांनाच होती. पण सूर्यकुमार यादवला यावेळी डच्चू देण्यात आली असून त्याच्याजागी रोहितला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आता अखेर रोहितला पाहण्याची प्रतिक्षा चाहत्यांची संपल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या सामन्यात रोहित शर्मा कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. रोहितला कधी संधी मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना होती. कारण पहिल्या दोन्ही सामन्यांत रोहितला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहितला पाहण्यासाठी चाहते आतूर झाले होते. जर रोहित शर्मा खेळणार नसेल तर मी टीव्ही चालू करणार नाही, असे विधान भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केले होते. इंग्लंडविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहितचे संघात पुनरागमन होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण रोहितला संघात स्थान दिले तर लोकेश राहुलला संघाबाहेर जावे लागेल. पण राहुलला संघाबाहेर न ठेवता विराट कोहलीलाच विश्रांती देण्यात यावी, असे विधान भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समाचोलक आकाश चोप्राने केले आहे. यावेळी आकाश म्हणाला की, " रोहितला जर संघात स्थान द्यायचे असेल तर त्यासाठी लोकेश राहुलला संघाबाहेर काढून नये, असे मला वाटते. कारण रोहित हा एक संघातील वरिष्ठ खेळाडू आहे. जर रोहितसारख्या खेळाडूला विश्रांती दिली जाऊ शकते, तर कोहलीला का नाही. त्यामुळे रोहितला जर संधी द्यायची असेल तर कोहलीने विश्रांती घ्यायला हवी आणि त्यामुळेच राहुलला खेळण्याची संधी मिळू शकते."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vxcbIw

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...