Ads

Tuesday, March 16, 2021

IND vs ENG : ... तर विराट कोहलीलाही संघाबाहेर ठेवायला हवे, माजी क्रिकेटपटूचे धक्कादायक विधान

अहमदाबाद, : सध्याच्या घडीला भारतीय संघात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने तर थेट कर्णधार विराट कोहलीलाच संघाबाहेर ठेवायला हवे, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहितचे संघात पुनरागमन होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण रोहितला संघात स्थान दिले तर लोकेश राहुलला संघाबाहेर जावे लागेल. पण राहुलला संघाबाहेर न ठेवता विराट कोहलीलाच विश्रांती देण्यात यावी, असे विधान भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समाचोलक आकाश चोप्राने केले आहे. यावेळी आकाश म्हणाला की, " रोहितला जर संघात स्थान द्यायचे असेल तर त्यासाठी लोकेश राहुलला संघाबाहेर काढून नये, असे मला वाटते. कारण रोहित हा एक संघातील वरिष्ठ खेळाडू आहे. जर रोहितसारख्या खेळाडूला विश्रांती दिली जाऊ शकते, तर कोहलीला का नाही. त्यामुळे रोहितला जर संधी द्यायची असेल तर कोहलीने विश्रांती घ्यायला हवी आणि त्यामुळेच राहुलला खेळण्याची संधी मिळू शकते." तिसऱ्या सामन्यात रोहित जर खेळायला आला तर कोणते बदल होतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण रोहित संघात आल्यावर तो सलामीलाच खेळायला येईल. त्यामुळे राहुलला कदाचित संघाबाहेर बसावे लागू शकते. भारताच्या मधल्या फळीत कोणताही बदल होणार नसल्याचेच संकेत मिळत आहेत. कारण कोहली आता चांगल्या फॉर्मात आला आहे. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतदेखील चांगली फलंदाजी करत आहेत. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्यावर यांच्यावर संघ व्यवस्थापन विश्वास कायम ठेवेल, असे दिसत आहे. त्यामुळे भारताच्या मधल्या फळीत कोणताही बदल होऊ शकणार नाही, असेच दिसत आहे. गोलंदाजीमध्ये कदाचित दोन बदल होऊ शकतात, असे दिसत आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलच्याजागी कदाचित एका अष्टपैलू किंवा फिरकीपटूला संघात स्थान देण्यात येऊ शकते. कारण वॉशिंग्टन सुंदर एकाबाजूने चांगली गोलंदाजी करत असताना चहलला मात्र अजून लय सापडलेली दिसत नाही. त्याचबरोबर या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्याऐवजी दीपक चहरला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एखादा सामना जिंकल्यावर कर्णधार शक्यतो संघ बदलत नाही, असे बऱ्याचदा पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यासाठी कोहली संघ कायम ठेवतो की त्यामध्ये काही बदल केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30OmXw8

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...