Ads

Friday, March 12, 2021

IND vs ENG : आर. अश्विनचे नाव काढल्यावर विराट कोहली भडकला, म्हणाला...

अहमदाबाद, : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आर. अश्विनने नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने अश्विनचे कौतुकही केले होते. पण कसोटी मालिका संपल्यावर एका पत्रकार परीषदेत जेव्हा अश्विनबाबत एक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कोहली चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. अश्विनचे भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन होणार का, असा प्रश्न विराटला विचारण्यात आला आहे. या प्रश्नावर विराट चांगलाच चिडलेला पाहायला मिळाला. त्यावेळी कोहली म्हणाला की, " टी-२० क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन चांगली कामगिरी करीत आहे. एकाच जागेसाठी एकाच प्रकारच्या दोन खेळाडूंना तुम्ही संधी देऊ शकत नाही. एखाद्या मोसमात वॉशिंग्टची कामगिरी कमालीची खालावत नाही तोपर्यंत तरी अश्विनला संधी मिळत नाही. असे प्रश्न विचारताना काही तरी तक्र असावा. तुम्हीच मला सांगा की अश्विनला संघात कुठे स्थान द्यावे? प्रश्न विचारणे सोपे आहे. पण आपण काय विचारत आहोत, याचाही पुरेसा विचार करायला हवा. " गेल्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करूनही अश्विनचे टी-२० पुनरागमन सध्या तरी शक्य नसल्याचे कोहलीने स्पष्ट केले. त्याचबरोबर वॉशिंग्टनने २६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत २९.१४च्या सरासरीनेच धावा दिल्या असून, त्याने २१ विकेटही मिळविल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी सुंदरलाच पहिले प्राधान्य दिले जाईल, असे कोहलीने आपल्या उत्तरामधून स्पष्ट केल्याचे पाहायला मिळाले आहे. तंदुरुस्तीबाबत तडजोड नाही - विराट कोहलीफिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती तंदुरुस्ती चाचणीत पुन्हा अपयशी ठरला. त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी निवड करण्यात आली होती. मात्र, त्याने खांद्याची दुखापत लपविली होती. तो यो-यो चाचणीतही यशस्वी ठरू शकला नाही. कोहली म्हणाला, " भारतीय क्रिकेट संघाने ही सिस्टिम तयार केली आहे आणि प्रत्येकाने ती समजून घेणे गरजेचे आहे. भारतीय संघाकडून खेळताना कुठल्या गोष्टींची गरज आहे, याची आम्ही खेळाडूंकडून अपेक्षा करूच शकतो. देशाकडून खेळताना तुमची तंदुरुस्ती सर्वोत्तम असलीच पाहिजे. तंदुरुस्तीबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही." यावेळी कोहलीने भारताच्या सलामीच्या जोडीबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. कोहली यावेळी म्हणाला की, " रोहित खेळणार असेल, तर सलामी जोडीचा प्रश्नच येत नाही. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा हीच जोडी डावाची सुरुवात करील. राहुल-रोहित या आघाडीच्या जोडीने कामगिरीत सातत्य राखले आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vhj8NU

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...