Ads

Sunday, March 14, 2021

पृथ्वी सावने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच क्रिकेटपटू

मुंबई : विजय हजारे करंडकामध्ये पृथ्वी सावने धडाकेबाज फलंदाजी करत इतिहास रचला आहे. कारण या स्पर्धेत अशी कामगिरी आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला करता आलेली नाही. पृथ्वीने या स्पर्धेत ८०० धावांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत या स्पर्धेत एकाही फलंदाजाला ८०० धावांपर्यंत पोहोचता आले नव्हते. पृथ्वीने २०२१ या मोसमात एकूण आठ सामने खेळले. या आठ सामन्यांमध्ये पृथ्वीने १६५.४०च्या सरासरीने ८२७ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत पृथ्वीची २२७ ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. त्याचबरोबर पृथ्वीने या स्पर्धेत १३८.२९ स्ट्राइक रेटने धावा करताना चार शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. विजय हजारे करंडकातील यावर्षीच्या स्पर्धेत पृथ्वीनंतर दुसऱ्या स्थानावर देवदत्त पडीक्कल आहे. या स्पर्धेत देवदत्तने ७३७ धावा केल्या आहेत. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईचा सलामीवीर पृथ्वी सावने यावेळी संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. पृथ्वीने यावेळी ३९ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली. या स्पर्धेत पृथ्वी साव हा सातत्याने दमदार फलंदाजी करत होता. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रमही पृथ्वीने आपल्या नावावर केला आहे. पृथ्वी बाद झाल्यावर आदित्य तरेने शतक झळकावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तरेने यावेळी १८ चौकारांच्या जोरावर नाबाद ११८ धावांची खेळी साकारली. मुंबईच्या संघाने विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत उत्तर प्रदेशला पराभूत केले आणि जेतेपदाला गवसणी घातली. उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघापुढे ३१३ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईच्या संघाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत उत्तर प्रदेशवर विजय सहा विकेट्स राखून साकारला. मुंबईच्या संघाने या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ केला होता. तरेने यावेळी चौकार लगावत मुंबईच्या विजयावर झोकात शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेतील तरेची ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. मुंबईच्या संघाला सय्यद मुश्ताक अहमद ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण त्यानंतर मुंबईने या स्पर्धेते जेतेपद पटकावत अपेक्षा उंचावल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lnbDAw

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...