मुंबई : मुंबईच्या संघाने विजय हजारे करंडकाला आज गवसणी घातली आणि अंतिम फेरीत उत्तर प्रदेशचा पराभव केला. या विजयानंतर मुंबईच्या इंडियन्सच्या संघाने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने मुंबईच्या एका खेळाडूचा फोटो वापरला आहे. त्याचबरोबर या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सने बरेच काही म्हटले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळी आपल्या संघातील आदित्य तरेचा फोटो आपल्या ट्विटमध्ये वापरला आहे. अंतिम फेरीत पृथ्वी बाद झाल्यावर आदित्य तरेने शतक झळकावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तरेने यावेळी १८ चौकारांच्या जोरावर नाबाद ११८ धावांची खेळी साकारली. तरेची ही खेळी मुंबईच्या विजयासाठी सर्वात मोलाची ठरली. मुंबई इंडियन्सने यावेळी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " आदित्य तरेच्या नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईच्या संघाला चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकता आली आहे." आदित्य तरे हा मुंबई इंडियन्सच्या संघाचा एक भाग आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून तरे हा मुंबई इंडियन्ससाठी खेळत आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत मुंबईच्या संघाने उत्तर प्रदेशला सहा विकेट्स राखून पराभूत केले आणि जेतेपदाला गवसणी घातली. उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघापुढे ३१३ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईच्या संघाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत उत्तर प्रदेशवर विजय सहा विकेट्स राखून साकारला. मुंबईच्या संघाने या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ केला होता. तरेने यावेळी चौकार लगावत मुंबईच्या विजयावर झोकात शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेतील तरेची ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. मुंबईच्या संघाला सय्यद मुश्ताक अहमद ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण त्यानंतर मुंबईने या स्पर्धेते जेतेपद पटकावत अपेक्षा उंचावल्या आहेत. पृथ्वीने यावेळी ३९ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली. या स्पर्धेत पृथ्वी साव हा सातत्याने दमदार फलंदाजी करत होता. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रमही पृथ्वीने आपल्या नावावर केला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eFRtQK
No comments:
Post a Comment