Ads

Saturday, March 6, 2021

वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ९६ धावा हे शतक समजले जाईल; कारण...

अहमदाबाद: इंग्लंडविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा डाव ३६५ धावांवर संपुष्ठात आला. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या २०५ धावांना भारताने चोख उत्तर दिले. विशेषत: टीम इंडियाने १४६ धावांवर ६ विकेट गमवल्या असताना तळातील फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि १६० धावांची महत्त्वाची आघाडी मिळून दिली. वाचा- भारताकडून पहिल्या डावात ऋषभ पंतने शतक झळकावले. तर ( )चे शतक ४ धावांनी हुकले. त्याने १७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह ५५.१७च्या स्ट्राइक रेटने नाबाद ९६ धावा केल्या. सुंदर फलंदाजीला आला होता तेव्हा भारताने ६ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर त्याने पंतसोबत शतकी भागिदारी केली आणि दुसऱ्या दिवसाचा डाव संपला तेव्हा संघाला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवशी त्याने अक्षर पटेल सोबत शतकी भागिदारी करून पहिल्या डावातील आघाडी मोठी केली. वाचा- तरी सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सुंदरच्या या ९६ धावा म्हणजे शतकच आहे. ज्या परिस्थितीत त्याने शतक केले ते सोपे नव्हते. तो फक्त गोलंदाज नाही तर एक अष्ठपैलू असल्याचे सिद्ध झाले आहे. सुंदरने अशा वेळी फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे जेव्हा संघात रविंद्र जडेजा नाही. वाचा- वाचा- यामुळे शतक करू शकला नाही सुंदर भारताने ११३.५ षटकात ७ बाद ३६५ धावा केल्या होत्या. ११४व्या षटकात अक्षर पटेलने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो धावबाद झाला. तेव्हा वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर खेळत होता आणि नॉन स्ट्रायकरवर होता. पटेलच्या जागी आलेल्या इशांत शर्माला पहिल्याच चेंडूवर बेन स्टोक्सने LBW बाद केले. त्यानंतर मोहम्मद सिराज फलंदाजीसाठी आला. सिराजने बेन स्टोक्सचे दोन चेंडू खेळून काढले. पण ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर तो बोल्ड झाला आणि सुंदर ९६ धावांवर नाबाद राहिला. वाचा- सुंदरचे शतक पूर्ण न झाल्याबद्दल सर्व चाहते निराश झाले. पण त्याच्या या नाबाद ९६ धावा शतका इतक्याच महत्त्वाच्या ठरल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30jnshe

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...