Ads

Monday, March 1, 2021

IND vs ENG : चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात होऊ शकतात हे दोन बदल, बुमराची जागा कोणा घेणार पाहा...

अहमदाबाद, : चौथा कसोटी सामना हा दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी नेमकी संघ निवड कशी करायची, याचा विचार आता सुरु झाला आहे. पण चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन महत्वाचे बदल होऊ शकतात, असे आता दिसत आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान देण्यात येणार नसल्याचे समजते आहे. तिसऱ्या सामन्याच बुमरा आणि सुंदर या दोघांनाही संधी देण्यात आली होती. पण या दोघांना या सामन्यात जास्त गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता चौथ्या कसोटी सामन्यात या दोघांना संघात कायम ठेवण्यात येणार नसल्याचे समजते आहे. बुमराच्या जागी उमेश यादव हा सर्वात चांगला पर्याय असू शकतो. कारण उमेशने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयची फिटनेस चाचणी पास केली आहे. त्याचबरोबर तो वेगवान गोलंदाजीही करु शकतो, त्यामुळे बुमराच्या जागी उमेश यादवला संघात स्थान मिळू शकते. सुंदरला जर वगळण्यात आले तर त्याच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. कारण जर सुंदरला संघातून वगळले तर त्याच्याजागी अजून एक फिरकीपटू संघात दाखल होऊ शकतो आणि तोच सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे सुंदरच्या जागी आता कुलदीपचा विचार संघ व्यवस्थापन चौथ्या कसोटी सामन्यासाठी करत आहे. कुलदीपला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. पण या सामन्यात कुलदीपला जास्त विकेट्स मिळवता आल्या नव्हत्या. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीपला वगळण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कुलदीपला संघात स्थान मिळू शकते, असे म्हटले जात आहे. चौथ्या कसोटी सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमचीदेखील परिक्षा होणार आहे. कारण यावेळी पुन्हा एकदा ज सामना लवकर संपला तर खेळपट्टी चांगल्या दर्जाची नसल्याच्या शिक्का आयसीसी मारु शकते. त्यानंतर बऱ्याच कालावधीसाठी या मैदानात सामने होणार नाहीत. यावर्षी भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि आयपीएल खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर किती दिवस चौथा सामना चालतो, यावर या मैदानाचे भवितव्य अवलंबून असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uHGg7W

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...