Ads

Friday, March 19, 2021

रोहितने दिलेल्या सल्ल्यामुळे सामन्याचा निकाल बदलला; शार्दुलने केला मोठा खुलासा

अहमदाबाद: चौथ्या टी-२० सामन्यात विजय मिळून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. भारताकडून सूर्यकुमार यादवने केलेल्या ५७ धावा केल्या. त्याच्या या खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वाचा- इंग्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी २३ धावांची गरज होती. भारताकडून अखेरचे षटक टाकत होता. त्याने १५ धावा दिल्या आणि भारताने ८ धावांनी विजय मिळवला. सामना झाल्यानंतर शार्दुलने अखेरचे षटक टाकण्याआधी रोहितने त्याची कशी काय मदत केली होती याबद्दल सांगितले. वाचा- शार्दुलच्या अखेरच्या षटकातील पहिले चार चेंडू अत्यंत वाइट होते. या चार चेंडूवर १ चौकार आणि १ षटकार तसेच दोन चेंडू वाइड टाके होते. त्यानंतर रोहितने त्याच्याशी येवून बोलला. वाचा- शार्दुल तुला तुझ्या योजनेनुसार गोलंदाजी करायची आहे. जर तु चांगली गोलंदाजी केलीस तर फलंदाज नक्की त्यावर शॉट मारणार. पण एक जरी चेंडूवर धाव मिळाली नाही तर फलंदाज टेन्शनमध्ये येईल आणि मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात चूक करेल, असे रोहितने त्याला सांगितले. वाचा- सामना झाल्यानंतर सूर्यकुमार यादवशी बोलताना शार्दुल म्हणाला, रोहितने माझा उत्साह वाढवला. मी त्याच्या सल्ल्यानुसार २ पैकी ३ चेंडूत डेड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला फलंदाजाने मारलेल्या शॉटने जज करू नको. चेंडूवर शॉट मारला तर दबाव घेऊ नको. पुढच्या चेंडूचा विचार कर. जर पुढचा चेंडू कोणत्याही दबावाशिवाय टाकलास तर फलंदाज मिस करेल. वाचा- या सामन्यात अखेरची चार षटके शिल्लक राहिली असताना विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर गेला. त्याच्या जागी रोहित शर्माने नेतृत्व केले. रोहितच्या खास योजनेमुळे भारताला यश मिळाले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s25b4n

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...