Ads

Friday, November 13, 2020

कर्णधाराने शतक पूर्ण करू दिले नाही; क्रिकेटपटूने रागाच्या भरात पाहा काय केले

नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू जेव्हा अर्धशतक किंवा शतकाच्या जवळ येवून बाद होतो तेव्हा त्याला आणि त्याच्या संघाला वाईट वाटते. पण जर एखादा फलंदाज जर शतकाच्या जवळ आल्यानंतर जर कर्णधाराने डाव जाहीर केला तर संबंधित फलंदाजाला राग न आला तरच नवल. २००४ साली पाकिस्तानविरुद्ध विरेंद सेहवागने त्रिशतक झळकावले. त्याच सामन्यात सचिन तेंडुलकर १९४ धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला होता. तेव्हा कर्णधार राहुल द्रविडने डाव घोषित केला होता. अशीच एक घटना क्रिकेटमध्ये घडली आहे. वाचा- पाकिस्तानविरुद्ध जेव्हा द्रविडने डाव घोषीत केला होता तेव्हा सचिनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण ऑस्ट्रेलियात एका सामन्यात कर्णधाराने शतक पूर्ण होऊ न दिल्याने फलंदाजाचा राग अनावर झाला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत न्यू साउथ वेल्स आणि तस्मानिया संघांविरुद्धच्या लढतीत सोबत एक अजब घटना घडली. १० नोव्हेबर रोजी न्यू साउध वेल्सकडून खेळताना स्टार्क पहिल्या प्रथम श्रेणी शतकाच्या जवळ पोहोचला होता. तेव्हा कर्णधार पीटर नोव्हिलने डाव घोषीत केला. या घटनेवर स्टार्कला राग आवरता आला नाही. त्याने ड्रेसिंग रुममध्ये पोहोचण्याआधी बॅट फेकून दिली. वाचा- तस्मानिया संघाने प्रथम फलंदाजी करत २३९ धावा केल्या. न्यू साउथ वेल्सने सामन्यावर पकड मिळवली होती. निक लारकिनने १६१ आणि मोइसेन्स हेनरिक्सने ११३ धावा केल्या. त्यानंतर स्टार्कने शानदार फलंदाजी केली. त्याने सीन एबॉट सोबत संघाला ५००च्या पुढे मजल मारून दिली. पण एबॉटचे शतक झाल्यावर कर्णधाराने डाव घोषीत केला. तेव्हा स्टार्क १३२ चेंडूत नाबाद ८६ धावांवर खेळत होता. वाचा- डाव जाहीर झाला तेव्हा स्टार्क आक्रमक फलंदाजी करत होता. त्याचे शतक देखील पूर्ण झाले असते. पण प्रत्यक्षात झाले नाही. ड्रेसिंग रुमकडे येताना सीमा रेषा ओलांडताच स्टार्कने बॅट रागाने फेकून दिली. न्यू साउथ वेल्स आणि ऑस्ट्रेलियाकडून १०३ सामने खेळणाऱ्या स्टार्कने अद्याप एकही शतक केले नाही. २०१३ साली भारताविरुद्ध मोहाली येथे तो ९९ धावांवर बाद झाला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eVxnzZ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...