Ads

Sunday, March 14, 2021

IND vs ENG : इंग्लंडने भारतापुढे किती धावांचे आव्हान ठेवले, पाहा...

अहमदाबाद, : दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडने प्रथण फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभारली. इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का बसला असला तरी त्यानंतर त्यांनी चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला यावेळी भारतापुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवता आले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने चांगील गोलंदाजी करत दोन बळीही मिळवले. सुंदरने यावेळी दमदार फटकेबाजी करणाऱ्या जेसन रॉयला पहिल्यांदा बाद केले. त्यानंतर सुंदरने जॉनी बेअरस्टोलाही तंबूत धाडले. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. भुवनेश्वरने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोस बटलरला आऊट केले आणि इंग्लंडची १ बाद १ अशी अवस्था केली. बटलरला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का बसला असला तरी त्यानंतर जेसन रॉय आणि डेव्हिड मलान यांनी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. रॉयने यावेळी षटकारासह इंग्लंडच्या संघाचे अर्धशतक पूर्ण केले. रॉय आणि मलान या जोडीने भारताच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला आणि मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली. पण त्यावेळी युजवेंद्र चहलने मलानला बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. मलानने यावेळी चार चौकारांच्या जोरावर २४ धावा केल्या. पण मलान बाद झाल्यावरही इंग्लंडने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. जेसन रॉय यावेळी मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण या सामन्यातही जेसनचे अर्धशतक हुकले. भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने यावेळी जसेनला भुवनेश्वर कुमारकरवी झेलबाद केले. जेसनने यावेळी ३५ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४६ धावा केल्या. सुंदरने यावेळी जॉनी बेअरस्टोला बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. जॉनीला यावेळी २० धावांवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने यावेळी दमदार फलंदाजी केली आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या रचून देण्यात महत्वाचा वाटा उचलला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lgXiFF

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...