Ads

Monday, March 15, 2021

IND vs ENG : तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकतात हे महत्वाचे बदल, रोहितला संधी मिळणार...

अहमदाबाद, : भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पण आता तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मंगळवारी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा ट्वेन्टी-२० सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघात काही महत्वाचे बदल होऊ शकतात. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. कारण पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीच्यावेळी कर्णधार विराट कोहलीने रोहितला दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आल्याचे सांगितले होते. त्यामुळे रोहित आता तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. रोहितला जर संघात खेळवायचे असेल तर लोकेश राहुलला यावेळी डच्चू द्यावा लागेल. कारण गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये राहुल हा सपशेल अपयशी ठरला आहे. पण कर्णधार कोहली कदाचित राहुलला अजून एक संधी देऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात रोहित खेळणार की नाही, हे पाहावे लागेल. भारताच्या मधल्या फळीत कोणताही बदल होणार नसल्याचेच संकेत मिळत आहेत. कारण कोहली आता चांगल्या फॉर्मात आला आहे. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतदेखील चांगली फलंदाजी करत आहेत. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्यावर यांच्यावर संघ व्यवस्थापन विश्वास कायम ठेवेल, असे दिसत आहे. त्यामुळे भारताच्या मधल्या फळीत कोणताही बदल होऊ शकणार नाही, असेच दिसत आहे. गोलंदाजीमध्ये कदाचित दोन बदल होऊ शकतात, असे दिसत आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलच्याजागी कदाचित एका अष्टपैलू किंवा फिरकीपटूला संघात स्थान देण्यात येऊ शकते. कारण वॉशिंग्टन सुंदर एकाबाजूने चांगली गोलंदाजी करत असताना चहलला मात्र अजून लय सापडलेली दिसत नाही. त्याचबरोबर या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्याऐवजी दीपक चहरला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एखादा सामना जिंकल्यावर कर्णधार शक्यतो संघ बदलत नाही, असे बऱ्याचदा पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यासाठी कोहली संघ कायम ठेवतो की त्यामध्ये काही बदल केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tm7TBR

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...