Ads

Monday, January 18, 2021

IND vs AUS : ... यालाच म्हणतात टीम इंडिया, अनुभवी खेळाडून दाखवला मनाचा मोठेपणा

ब्रिस्बेन, : भारतीय संघ कसा एकजुट आहे, याचे दर्शन आज पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाले. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी शिवीगाळ केली होती. पण सिराज डगमगला नाही. सिराजने आज पाच विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. आपल्या या युवा शिलेदाराचे कौतुक करायला संघातील अनुभवी खेळाडू विसरला नसल्याच यावेळी पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. सिराजने चौथ्या दिवशी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ गारद केला आणि त्यांचे कंबरडे मोडले. सिराजच्या भेदक माऱ्यामुळेच ऑस्ट्रेलियाला यावेळी तिनशे धावांचा पल्लाही गाठता आला नाही. सिराजने यावेळी स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि मॅथ्यू वेड या तिघांना बाद करत ऑस्ट्रेलियाची मधळी फळी खिळखिळी करून टाकली. त्याचबरोबर अन्य दोन फलंदजांना बाद करत सिराजने पहिल्यांदाच कसोटी मालिकेत पाच विकेट्स मिळवण्याचा पराक्रम केला आहे. सामना संपल्यावर कर्णधार अजिंक्य रहाणेने यावेळी सिराजला प्रथम पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा मान दिला. त्यावेळी भारतीय खेळाडू सिराजचे कौतुक करत होते. पण यावेळी भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराने सिराजचे फक्त कौतुकच केले नाही, तर बुमराने यावेळी सिराजला मिठी मारत त्याला शाबासकीही दिली. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहल्यावर चाहते सिराजबरोबरच बुमराचेही कौतुक करत असल्याचे पाहाला मिळत आहे. सिराजने यावेळी भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथचा २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढल्याचेही पाहायला मिळाले आहे. सिराजने आतापर्यंत यया मालिकेत १३ बळी मिळवण्याची किमया साधली आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीनाथच्या नावावर होता. श्रीनाथने १९९१ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात आपल्या नावावर १० विकेट्स मिळले होते. आपल्या पदार्पणाच्या मालिकेत आता सर्वाधिक विकेट्सचा विक्रम यापूर्वी श्रीनाथच्या नावावर होता, तो विक्रम आता सिराजने आपल्या नावावर केला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2XN1NwR

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...