Ads

Monday, January 18, 2021

IND vs AUS : शाब्बास सिराज... चौथ्या कसोटीत रचला अनोखा इतिहास

ब्रिस्बेन, : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. सिराजने चौथ्या कसोटी सामन्यात इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर सिरजाने या सामन्यात ५५१ विकेट्स मिळवणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा विक्रम मोडीत काढला आहे. सिराजने चौथ्या दिवशी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ गारद केला आणि त्यांचे कंबरडे मोडले. सिराजच्या भेदक माऱ्यामुळेच ऑस्ट्रेलियाला यावेळी तिनशे धावांचा पल्लाही गाठता आला नाही. सिराजने यावेळी स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि मॅथ्यू वेड या तिघांना बाद करत ऑस्ट्रेलियाची मधळी फळी खिळखिळी करून टाकली. त्याचबरोबर अन्य दोन फलंदजांना बाद करत सिराजने पहिल्यांदाच कसोटी मालिकेत पाच विकेट्स मिळवण्याचा पराक्रम केला आहे. सिराजने यावेळी भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथचा २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढल्याचेही पाहायला मिळाले आहे. सिराजने आतापर्यंत यया मालिकेत १३ बळी मिळवण्याची किमया साधली आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीनाथच्या नावावर होता. श्रीनाथने १९९१ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात आपल्या नावावर १० विकेट्स मिळले होते. आपल्या पदार्पणाच्या मालिकेत आता सर्वाधिक विकेट्सचा विक्रम यापूर्वी श्रीनाथच्या नावावर होता, तो विक्रम आता सिराजने आपल्या नावावर केला आहे. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी सिराजला शिवीगाळ केली होती, त्याचबरोबर त्याच्यावर वर्णद्वेषी टीकाही केली होती. पण या सर्व गोष्टींनी सिराज डगमगला नाही, उलट सिराजने यावेळी भन्नाट कामगिरी करत या प्रेक्षकांना चोख उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा दिवस चांगलाच रंगतदार ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताने ३०० धावांच्या आतमध्येच रोखले. मोहम्मद सिराजने यावेळी पाच विकेट्स मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले, तर शार्दुल ठाकूर चार विकेट्स मिळवत त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे पाचव्या दिवशी आता विजयासाठी भारताला ३२४ धावांची गरज आहे. पहिल्या दिवसअखेर रोहित शर्माच्या चौकाराच्या जोरावर भारताची बिनबाद ४ अशी धावसंख्या आहे. त्यामुळे आता सामन्याच्या पाचव्या दिवशी कोणत्या संघाचा विजयी झेंडा फडकणार, याची उत्सुकता सर्वच क्रिकेट चाहत्यांना असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38VVaPb

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...