Ads

Thursday, January 21, 2021

कर्णधार रहाणेचं अजिंक्य हे नाव कसं पडलं; पाहा काय आहे यामागची खास स्टोरी

मुंबई : सध्याच्या घडीला अजिंक्य रहाणे हे नावं सर्वांच्याच ओठावर आहे. पण रहाणेचं अजिंक्य हे नाव नेमकं कसं पडलं, काय आहे त्याच्या मागची स्टोरी... ही गोष्ट सांगितली आहे अजिंक्यचे वडिल मधुकर रहाणे यांनी महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमबरोबर झालेल्या खास मुलाखतीमध्ये... अजिंक्यच्या नावाबाबत त्याचे वडिल मधुकर रहाणे यांनी सांगितले की, " अजिंक्यचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले अभिनेते रमेश देव यांचा मुलगा चांगली कामं करत होता. त्याचे नाव अजिंक्य होते. हे नाव आम्हाला आवडले. त्यामुळे आम्ही माझ्या मुलाचे नावही अजिंक्य असेच ठेवले. अजिंक्य हे नाव ठेवण्यामागे खास असा हेतू नव्हता. पण त्यावेळी आम्हाला ते नाव फार आवडले होते, त्यामुळे त्याचे अजिंक्य नाव ठेवायचे हे आम्ही ठरवले होते." ब्रिस्बेन कसोटीच्या अखेरच्या क्षणी नेमकं मनात काय चालू होतं...चौथा कसोटी सामना हा अखेरच्या क्षणी फार रंजकदार अवस्थेत होता. भारतीय संघ सामना जिंकणार की नाही, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. याबाबत मधुकर यांनी सांगितले की, " चौथ्या सामन्याच्या अखेरच्या दिवशी मी सकाळपासून सामना पाहत होतो. पण काही कारणास्तव मला घराबाहेर पडावं लागलं होतं. पण तरीही मी सातत्याने स्कोर पाहत होतो आणि त्यावर नजर ठेवून होतो. हा सामना भारतीय संघ ९९ टक्के जिंकणार, अशी मला खात्री होती. पण एक टक्का हा सामना अनिर्णीत होऊ शकेल, असे वाटत होते. पण भारतीय संघातील खेळाडूंवर विश्वास होता. ही मुलं भारताला विजय मिळवून देतील, असं वाटत होतं." भारताच्या विजयाबद्दल मधुकर म्हणाले की, " भारतीय संघ जिंकल्याचा आनंद तर झालाच. पण भारतीय संघाला जो मान मिळाला तो माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. भारतीय संघाने त्या मैदानात ३२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत इतिहास रचला. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. अजिंक्य विजयानंतर गडबडीत होता आणि थोडा थकलेला होता. त्यामुळे सामन्यानंतर त्याच्याशी आमचं जास्त बोलणं झालं नाही. पण आता घरी आल्यावर नक्कीच आम्ही त्याचे स्वागत करू आणि त्याला शुभेच्छा नक्कीच देऊ. "


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sHPJLx

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...