Ads

Tuesday, January 19, 2021

IND vs AUS : भारताच्या विजयानंतर अजिंक्य रहाणे नेमकं काय म्हणाला, पाहा...

ब्रिस्बेन, : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयानंतर अजिंक्यवर जोरदार कौतुक होत आहे. पण अजिंक्य या विजयानंतर नेमकं काय म्हणाला, पाहा... या विजयानंतर अजिंक्य म्हणाला की, " पहिला कसोटी सामना आम्ही गमावला होता. त्यामुळे या सामन्यानंतर आम्ही जास्त बोललो नाही. या सामन्यानंतर उर्वरीत कसोटी सामने चांगल्यापद्धतीने खेळायचे, आपली गुणवत्ता दाखवून द्यायची, हेच ठरवले होते. सामन्याचा निकाल काय लागेल, याचा विचार आम्ही केला नव्हता. त्यामुळेच आमच्यासाठी हा विजय फार मोलाचा आहे. " या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन म्हणाला की, " आम्ही ही मालिका जिंकण्यासाठीच मैदानात उतरलो होतो. पण आमच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी झाली नाही. माझ्यामते भारताने फार शिस्तबद्ध खेळ केला आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला खेळ केला, त्यामुळेच त्यांना ही मालिका जिंकता आली." अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला. भारतीय संघाने बोर्डर-गावस्कर ट्राॉफीमध्ये विजयाची हॅट्रीक नोंदवली, त्याचबरोबर ब्रिस्बेनच्या मैदानात भारतीय संघाना बऱ्याच वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया करून दाखवली. त्यामुळे भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात धमाकेदार विजय मिळवला. रिषभ पंतने चौकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण या विजयासह भारतीय संघाने एक हॅट्रिकही साधली आहे. भारताने २०१६-१७ साली बोर्डर-गावस्कर ट्रॉफी पहिल्यांदा जिंकली होती. त्यानंतर २०१८-१९ साली बोर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती आणि ती भारताने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग तीन मालिका भारताला यापर्वी कधीच जिंकता आल्या नव्हत्या. कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत चांगलीच चुरस रंगली होती. भारतीय संघाचे सर्वात जास्त गुण असले तरी विजयाच्या टक्केवारीमुळे त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते, तर ऑस्ट्रेलियाचा संघ हा अव्लल स्थानावर होता. पण या विजयानंतर भारतीय संघ या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाल्याचे पाहायला मिळत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NdvKUx

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...