Ads

Wednesday, January 20, 2021

अखेर स्टीव्ह स्मिथला बसला झटका; कर्णधारपदावरून हकालपट्टी

नवी दिल्ली: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खराब कामगिरी आणि त्यानंतर अखिलाडीवृत्तीमुळे चर्चेत आलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज () याला झटका बसला आहे. आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी सर्व संघांनी रिटने आणि रिलीझ करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. स्टीव्ह स्मिथ आयपीएलमध्ये ज्या संघाचे नेतृत्व करत होता त्या () संघाने त्याला रिलीझ केले आहे. वाचा- स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थान चांगली कामगिरी करू शकला नाही. स्मिथला रिलीझ करण्यामागचे मुख्य कारण २०२०च्या आयपीएलमधील त्याची खराब कामगिरी होय. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत राजस्थानचा संघ अखेरच्या क्रमांकावर होता. स्मिथने १४ सामन्यात १३१च्या स्टाइक रेटने ३११ धावा केल्या. ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश होता. होय आम्ही स्मिथला रिलीझ केले आहे. याबाबतचा निर्णय आज घेण्यात आल्याचे राजस्थान संघाने म्हटले. वाचा- राजस्थान संघाच्या व्यवस्थापनाच्या मते, संघाने २०२०च्या आयपीएलमध्ये किमान प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले पाहिजे होते. २००८ साली पहिल्या स्पर्धेचे विजेतेपद राजस्थान रॉयल्सने मिळले होते. त्यानंतर २०१३, २०१५ आणि २०१८ साली त्यांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते. स्मिथला आयपीएल २०२० मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, हा एक चर्चेचा विषय ठरला होता. त्याने सातत्याने फलंदाजीचा क्रम बदलला. प्रथम तो सलामीला आला नंतर मधळ्या फळीत फलंदाजी केला. वाचा- २०१८ साली राजस्थानचा संघ दोन वर्षाच्या बंदीनंतर जेव्हा पुन्हा आयपीएलमध्ये आला तेव्हा स्मिथला १२.५ कोटी रुपयांना रिटेन केले होते. २०१९ साली जेव्हा त्याच्यावर बंदी घातली गेली तेव्हा अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली. वाचा- स्मिथला रिलीझ केल्यास राजस्थान संघाला नवा कर्णधार नियुक्त करावा लागेल. स्मिथला रिलीझ केल्यामुळे आत तो लिलावासाठी उपलब्ध झाला आहे. त्याची खरेदी कोणता संघ करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राजस्थान संघाने इंग्लंडचा जोफ्रा आर्चर, भारताचा संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांना रिटेन केले आहे. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39MkWEA

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...