Ads

Wednesday, January 20, 2021

ब्रिस्बेन कसोटी: वडिलांच्या 'त्या' शब्दांनी शार्दुलला मिळाली यशाची गुरूकिल्ली!

मुंबई: journey from palghar to brisbane ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत अखेरच्या दिवशी शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत हे भारतीय संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पण त्याआधी पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदर आणि (shardul thakur) यांनी केलेल्या शतकी भागिदारीमुळे टीम इंडिया ऐतिहासिक विजय साकार करू शकली. चौथ्या कसोटीत संधी मिळालेल्या शार्दुलने ७ विकेट घेतल्या तर फलंदाजीत ६९ धावा केल्या. ब्रिस्बेनमध्ये शार्दुलने जे काही त्याची नोंद रेकॉर्ड बुक आणि क्रिकेट इतिहासात झाली आहे. वाचा- शार्दुलच्या या विजयानंतर इंटरनेटवर त्याचे गाव पालघर गुगलवर सर्च केले जात आहे. २६ वर्षीय शार्दुल पालघरमधील माहिम केलवा गावचा, पण गावात अशी कोणती शाळा नव्हती जी क्रिकेट खेळायची. यासाठी शार्दुलचे कुटुंब पालघरमधून बोईसरला आले. तेथे तो टीव्हीएम शाळेकडून क्रिकेट खेळू लागला. शालेय क्रिकेटमध्ये त्याने बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेकडून खेळताना ६ चेंडूत ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१२ साली तो मुंबईकडून प्रथम श्रेणी सामन्यात उतरला. वाचा- ब्रिस्बेन कसोटीच्या आधी शार्दुलने कसोटीत फक्त १० चेंडू टाकले होते आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त चार होती. त्याने पहिल्या डावात ३ विकेट तर फलंदाजीत ६७ धावा केल्या. सुंदर सोबत त्याने सातव्या विकेटसाठी विक्रमी १२३ धावांची भागिदारी केली. कसोटीतील पहिले अर्धशतक पूर्ण करताना या दोघांनी ऑस्ट्रेलिया प्रथमच एका सामन्यात ३ विकेट आणि अर्धशतक करण्याचा पराक्रम केला. जगातील अन्य कोणत्याही परदेशी संघाला ही कामगिरी करता आली नाही. तर दुसऱ्या डावात शार्दुलने ४ विकेट घेतल्या. वाचा- चौथ्या कसोटीत संधी मिळाल्यानंतर शार्दुलेच वडील नरेंद्र ठाकूर यांनी त्याला एक सल्ला दिला. वडिलांनी दिलेल्या या सल्ल्यामुळेच शार्दुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी केली. वडील त्याला म्हणाले होते की, 'घाई करू नको. हे कसोटी क्रिकेट आहे निवांतपणे वेळ घेऊन खेळ.' वाचा- वडिलांच्या या एका वाक्याने शार्दुलला यशाची गुरुकिल्ली मिळाली. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना नरेंद्र ठाकूर म्हणाले, मी आणि माझ्या भावांनी त्याला हाच सल्ला दिला होता. ज्युनिअर क्रिकेटमध्ये त्याने फलंदाज म्हणून सुरूवात केली होती. आमची इच्छा होती की त्याने अष्टपैलू म्हणून फलंदाजी करावी. शार्दुलचा मित्र अजिंक्य नाईक म्हणाला, मालिका सुरू झाल्यावर जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा त्याने भारताकडून खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले होते. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी एक संधी मिळावी अशी त्याची इच्छा होती. लॉकडाउनच्या काळात पालघर सारख्या ठिकाणी राहण्याचा त्याला फायदा झाला. तो समुद्र किनाऱ्यावर आणि रस्त्यावर जॉगिंगसाठी जात होता. यामुळे फिटनेस कायम ठेवण्यात त्याला मदत मिळाली. वाचा- ठाकूरने घराजवळच्या मैदानावर गेल्यावर्षी सराव सुरू केला होता. तेव्हा असे वृत्त आले होते की बीसीसीआय आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्याच्यावर कारवाई करेल. पण ठाकूर सराव करत राहिला ज्याचा परिणाम आता दिसतोय. शार्दुल पहाटे ३.४५ ला उठायचा आणि पाच वाजताची रेल्वे पकडून बोरिवलीला जायचा जेणेकरून तो शाळेकडून क्रिकेट खेळू शकले. रोज पालघरवरून क्रिकेट खेळण्यासाठी जात असल्याने त्याचे नाव पालघर एक्सप्रेस पडले होते. रोज तीन तास प्रवास केल्याने तो आधीपासून मानसिकरित्या मजबूत झाला, असे नरेंद्रने सांगितले. वाचा- शार्दुलला २०१८ साली सर्व प्रथम कसोटी संघात स्थान मिळाले होते. पण अंतिम ११ मध्ये त्याची निवड झाली नाही. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने कसोटीत पदार्पण केले. पण पहिल्याच सामन्यात १० चेंडू टाकल्यांतर त्याला दुखापतीमुळे बाहेर जावे लागले होते. त्यानंतर २०२१ मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी मिळाली आणि त्याचे त्याने सोने केले. या कामगिरीमुळेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याचा भारतीय संघात समावेश केला आहे. भारतीय संघाकडून जर्सी क्रमांक १० घालणारा सचिन तेंडुलकनंतरचा तो दुसरा क्रिकेटपटू होता. सचिनच्या निवृत्तीनंतर शार्दुलने १० क्रमांकाची जर्सी घातली होती. पण यावरून सोशल मीडियावर बराच वाद झाल्यानंतर त्याने ५४ क्रमांकाची जर्सी निवडली. त्यानंतर बीसीसीआयने २०१७ साली जर्सी क्रमांक १० ला निवृत्त केले. शार्दुलला २०१६ साली सर्व प्रथम भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले होते. पण अंतिम ११ मध्ये जागा मिळाली नाही. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध वनडेत ऑगस्ट २०१७ साली त्याने पदार्पण केले. तर फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२०मध्ये पदार्पण केले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MbfjYE

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...