नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. हे दोन्ही सामने चेन्नई येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात कोणाला मिळाली संधी, पाहा... भारतीय संघात यावेळी मोठे बदल झाले आहेत. भारताचे कर्णधारपद आता पुन्हा एकदा विराट कोहलीकडे देण्यात आले आहे आणि अजिंक्य रहाणे हे उपकर्णधार असेल. ऑस्ट्रेलियातील विजयानंतर अजिंक्यकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात येईल, असे वाटत होते. पण मात्र तसे घडलेले दिसत नाही. भारतातील खेळपट्ट्या पाहता या संघात फिरकीपटूंना जास्त स्थान देण्यात आले आहे. या संघात आर. अश्विनबरोबर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर असे चार फिरकीपटू आहेत. त्याचबरोबर भारतीय संघात वेगवान गोलंदाज इशांत शर्माचे पुनरागमन झाले आहे. भारतीय संघात इशांतबरोबर जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची धुरा सोपवण्यात आली आहे. भारताच्या सलामीसाठी यावेळी तीन पर्याय ठेवण्यात आले आहेत. यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. पृथ्वी शॉ याला यावेळी संघातून डच्चू देण्यात आला आहे. या संघात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात खेळू न शकणाऱ्या लोकेश राहुललाही या संघात स्थान देण्यात आले आहे. संघातील यष्टीरक्षणाची जबाबदारी यावेळी रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजाराने संघातील आपले स्थान कायम राखले आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला. भारतीय संघाने बोर्डर-गावस्कर ट्राॉफीमध्ये विजयाची हॅट्रीक नोंदवली, त्याचबरोबर ब्रिस्बेनच्या मैदानात भारतीय संघाना बऱ्याच वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया करून दाखवली. त्यामुळे भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाचे कौतुक करण्याती बीसीसीआयही मागे राहिलेली नाही. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना भरगच्च बोनस यावेळी जाहीर केला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35UgKS8
No comments:
Post a Comment