नवी दिल्ली : भारताच्या सहा खेळाडूंना आता चांगलीच बढती मिळू शकते, असे चिन्ह दिसत आहे. कारण या सहा खेळाडूंना आता कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या पंक्तीत स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे सहा खेळाडू आता चांगलेच मालामाल होणार असल्याचे दिसत आहे. बीसीसीआय दरवर्षी आपल्या खेळाडूंबरोबर करार करत असते. या करारामध्ये आता मोठा बदल होणार असल्याचे पाहायला मिळू शकते. कारण नवीन करारामध्ये भारताचे सहा खेळाडू चांगलेच मालामाल होणार असल्याचे दिसत आहे. बीसीसीआयच्या A+ या कराराच्या गटामध्ये सध्याच्या घडीला कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हे तीन खेळाडू आहेत. पण आता पुढच्या करारामध्ये भारताच्या अजून सहा खेळाडूंना A+ या कराराच्या गटामध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. हे सहा खेळाडू आहेत तरी कोण, पाहा... अजिंक्य रहाणे विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून मायदेशी परतल्यावर अजिंक्य रहाणेने भारतीय संघाची कमान यशस्वीरीत्या सांभाळली आहे. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभूत करण्याची किमया करून दाखवली. त्याचबरोबर तिसरा सामना हा वाचवूनही दाखवला. त्यामुळे आता अजिंक्यला बीसीसीआयच्या A+ या कराराच्या गटामध्ये स्थान मिळू शकते, असे म्हटले जात आहे. मोहम्मद शमी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बीसीसीआयच्या A+ या कराराच्या गटामध्ये स्थान मिळू शकते. कारण शमीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर अनुभवाच्या जोरावर शमीने भारतीय संघाची मान उंचावली आहे. हार्दिक पंड्या आपल्या अष्टपैलू कामगिरीने हार्दिकने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या करारामध्ये आता हार्दिकला बढती मिळू शकते, असे दिसत आहे. हार्दिकचा समावेश बीसीसीआयच्या A+ या कराराच्या गटामध्ये होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. रवींद्र जडेजा सातत्याने चमकदार कामगिरी करत रवींद्र जडेजाना भारतीय संघातील स्थान कायम राखले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातही जडेजाने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे आता पुढच्या करारामध्ये जडेजाला बीसीसीआयच्या A+ या कराराच्या गटामध्ये स्थान देण्याची दाट शक्यता आहे. युजवेंद्र चहल गेल्या काही मालिकांमध्ये फिरकीपटू युजवेंद्र चहलने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या A+ या कराराच्या गटामध्ये चहलला संधी मिळू शकते. या गटात सामील होणारा चहल हा भारताचा एकमेव फिरकीपटू ठरू शकतो. लोकेश राहुल विराट कोहलीनंतर भारताची धुरा लोकेश राहुल सांभाळू शकतो, असे म्हटले जात होते. त्यामुळे जर राहुलला हे महत्वाचे पद मिळणार असेल तर त्याला बीसीसीआय A+ या कराराच्या गटामध्ये ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qtCY57
No comments:
Post a Comment