ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या ( ) आणि () या जोडीने सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागिदारी करून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना रडवले. या भागिदारीमुळे यजमान संघाला फक्त ३३ धावांची आघाडी घेता आली. वाचा- ठाकूर आणि सुंदर या जोडीने काल अनेक विक्रम केले. सातव्या विकेटसाठी भारताकडून झालेली ही सर्वोच्च भागिदारी ठरली. त्यांनी कपील देव आणि मनोज प्रभाकर यांचा विक्रम मागे टाकला. या शिवाय या दोघांनी एक अनोखा विक्रम नोंदवला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एखाद्या कसोटीत प्रथमच दोन खेळाडूंनी गोलंदाजीत ३ विकेट घेतल्या आणि नंतर फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. ब्रिस्बेन कसोटीत पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने ३ विकेट घेतल्या होत्या. तर याआधी फक्त एका कसोटी सामन्याचा अनुभव असेलल्या ठाकूरने देखील ३ विकेट घेतल्या होत्या. ठाकूर ब्रिस्बेन कसोटीच्या आधी फक्त १० चेंडू टाकले होते. वाचा- फलंदाजीत या दोघांनी कसोटी करिअरमधील पहिले अर्धशतक झळकावले. याआधी ठाकूरची सर्वोच्च धावसंख्या चार होती. तर सुंदरने पदार्पणातच अर्धशतक केले. ठाकूरने ११५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६७ तर सुंदरने १४४ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ६२ धावा केल्या. वाचा- शार्दुल ठाकूरने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत भारताकडून तिसऱ्या क्रमांकाची खेळी केली. या यादीत अनिल कुंबळे पहिल्या स्थानावर आहे. त्याने २००८ साली ८७ धावा केल्या होत्या. तर रविंद्र जडेजाने २०१९ साली ८१ धावा केल्या आहेत. वाचा- वॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियात पदार्पण करताना दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या. त्याने गोलंदाजीत ३ विकेट देखील घेतल्या. तर फलंदाजी ६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया पदार्पणात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये मयांक अग्रवाल पहिल्या स्थानावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियात ७६ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3syUJ54
No comments:
Post a Comment