Ads

Sunday, February 14, 2021

IND vs ENG : अजिंक्य रहाणेचा अनोखा विक्रम, पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

चेन्नई, : अजिंक्य रहाणेने दुसऱ्या कसोटी सामन्यात एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात हा पराक्रम करणारा अजिंक्य हा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. अजिंक्यने दुसऱ्या कसोटी सामन्यात ६७ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. या ६७ धावांसह विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत एक हजार धावा करणारा अजिंक्य हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. अजिंक्यने आतापर्यंत या स्पर्धेत १५ सामने खेळले आहेत. या १५ सामन्यांमध्ये अजिंक्यने ४७.७७च्या सरासरीने १०५१ धावा पूर्ण केल्या आहेत. या एक हजार धावांमध्ये तीन शतकांसह सहा अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत एक हजार धावा करणारा अजिंक्य हा क्रिकेट विश्वातील पाचवा खेळाडू ठरला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अजिंक्यवर जोरदार टीका होत होती. पण कठिण परिस्थितीमध्ये अजिंक्यने महत्वाची खेळी साकारली. अजिंक्य आणि रोहित यांच्या भागीदारीमुळेच भारतीय संघाला पहिल्या दिवशी ३०० धावांचा पल्ला गाठता आला होता. अजिंक्यने यावेळी एक हजार धावा पूर्ण करताना विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही मागे टाकले आहे. विराट कोहली या यादीमध्ये पहिल्या १० खेळाडूंमध्येही नाही. कोहलीने या स्पर्धेत १२ सामन्यांमध्ये ४६.३५च्या सरासरीने ७८८ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकांसह चार अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत अजिंक्यनंतर रोहित हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. रोहितने आतापर्यंत या स्पर्धेत ९ सामन्यांमध्ये ८६४ धावा केल्या आहेत. यामध्ये रोहितने चार शतकेही लगावलेली आहेत. या यादीत रोहित हा नवव्या स्थानावर आहे. भारतीय संघाच्या क्रिकेटच्या इतिहासात एका डावात कोणतीही अतिरिक्त धाव न घेता झालेल्या या सर्वाधिक धावा आहेत. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या एकही अतिरिक्त धाव दिली नाही. कसोटीत अतिरिक्त धाव न घेता करण्यात आलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. याआधी पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध १९५४-५५ साली लाहोर येथे झालेल्या कसोटीत ३२८ धावा केल्या होत्या. तेव्हा भारताने एकही अतिरिक्त धाव दिली नव्हती आणि पाकने ३२८ धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाचा हा विक्रम ६६ वर्षानंतर आज भारताने मोडल्याचे पाहायला मिळाले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZhzlE6

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...