Ads

Sunday, February 14, 2021

IND vs ENG : भारताने मोठी आघाडी तर घेतली, पण ही महत्वाची संधी गमावली...

चेन्नई, : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताकडे एकूण २४९ धावांची आघाडी होती. भारताने या सामन्यात मोठी आघाडी घेतली असली तरी एक महत्वाची संधी त्यांनी गमावली आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडे इंग्लंडवर फॉलोऑन लादण्याची सुवर्णसंधी होती. कारण इंग्लंडचे महत्वाचे फलंदाज शंभर धावांच्या आतमध्येच बाद झाले होते. त्यामुळे भारतीय संघ यावेळी इंग्लंडवर फॉलोऑन लादेल, असे वाटत होते. पण त्यावेळी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी काही काळ चांगली फलंदाजी केली आणि त्यामुळेच भारतीय संघाला इंग्लंडवर फॉलोऑन लादता आला नाही. भारतीय संघाने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला फॉलोऑन टाळण्यासाठी यावेळी १३० धावा करणे गरजेचे होते. इंग्लंडची ५०व्या षटकात ८ बाद १०६ अशी अवस्था होती. त्यावेळी इंग्लंडच्या दोन फलंदाजांना झटपट बाद करुन भारतीय संघ फॉलोऑन लादू शकतो, असे वाटत होते. पण त्यानंतर इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी नवव्या विकेटसाठी २५ धावांची भागीदारी रचली आणि १३० धावा गाठल्या. इंग्लंडची नववी विकेट १३१ धावांवर पडली आणि त्यानंतर इंग्लंडचा संघ १३४ धावांत ऑलआऊट झाला. भारताकडून यावेळी आर. अश्विनने भेदक गोलंदाजी करत पाच विकेट्स मिळवण्याची किमया केली. वर्षभरानंतर भारतीय चाहते यावेळी स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहत आहे. करोनानंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांना यावेळी स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली आहे. प्रेक्षक हे भारताच्या संघातील १२व्या खेळाडूचे काम करताता, असे म्हटले जाते. विराट कोहलीनेही यावेळी पहिल्यांदाच स्टेडियममध्ये आलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आणि सामन्यातही मजा आली. विराट कोहली हा प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला सांगत होता. त्याचबरोबर आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा संघ हा विसल पोडू म्हणूनही ओळखला जातो. कारण त्यांच्या थीम साँगमध्ये शिट्यांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे कोहली यावेळी प्रेक्षकांना शिट्या मारायलाही सांगत असल्याचे पाहायला मिळाले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dd1EM8

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...