Ads

Monday, February 15, 2021

IND vs ENG : चेन्नईच्या खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांची सुनील गावस्करांनी केली तोडं बंद, म्हणाले...

चेन्नई, : चेन्नईच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळायला लागली आणि इंग्लंडच्या माजी क्रिकेपटूंनी पीचवर टीका करायला सुरुवात केली. पण यावेळी भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी टीकाकारांना चांगलेच झापल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर गावस्कर यांनी यावेळी काही उदाहरणंही दिल्याचे पाहायला मिळाले. गावस्कर म्हणाले की, " जेव्हा इंग्लंडमध्ये गवत असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा ४६ धावांवर ऑलआऊट होतो तेव्हा कोणीही खेळपट्टीबाबत बोलत नाही. पण जेव्हा भारतामध्ये फिरकीला पोषक खेळपट्टी पाहायला मिळते, त्यावर मात्र टीका व्हायला सुरुवात होते. जर खेळपट्टी एवढी खराब असली असती तर रोहित शर्माने दिडशतक झळकावले नसते. त्याचबरोबर भारतीय संघाने तिनशे धावांचा पल्लाही गाठला नसता. त्यामुळे खेळपट्टीवर टीका करताना काही गोष्टी पाहायला हव्यात." चेन्नईच्या खेळपट्टीबाबत गावस्कर म्हणाले की, " चेन्नईची खेळपट्टी ही खेळण्यास अयोग्य आहे, हे म्हणजे साफ चुकीचे आहे. माझ्यामते या खेळपट्टीवर खेळणे अशक्य नाही. ही एक आव्हानात्मक खेळपट्टी आहे, पण क्रिकेटमध्ये अशी आव्हान असायलाच हवीत. पहिल्या कसोटी सामन्यातील दोन दिवशी जेव्हा गोलंदाजांना मदत मिळत नव्हती तेव्हा काही जणांनी खेळपट्टीवर टीका केली होती. खेळपट्टीची काहीच मदत गोलंदाजांना मिळत नाही आणि सामना निरस होत असल्याचे काही जणांनी सांगितले होते. प्रत्येक वेळी खेळपट्टीवर टीका करत राहणं हे योग्य नाही." चेन्नईच्या पीचवरुन कालही झाले होते वाद... सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला होता की, " चेन्नईची खेळपट्टी ही कसोटी सामन्यासाठी नक्कीच चांगली नाही. कारण पहिल्या कसोटी सामना जर भारतीय संघाने या खेळपट्टीवर अनिर्णीत राखला असता तर त्यांची फलंदाजी या सामन्यात अजून चांगली झाली असतील. पण गेल्या दोन सत्रांमध्ये खेळपट्टीने निराश केले असल्याचे मला वाटते." ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नने वॉनला यावेळी चांगलेच उत्तर दिले आहे. वॉर्न यावेळी म्हणाला की, " पहिल्या कसोटी सामन्यातही खेळपट्टी फिरकीला पोषक होती. पण त्यावेळी भारतीय संघाला जिंकण्याची संधी नव्हती त्यामुळे खेळपट्टीबाबत कोणीच काही म्हटले नाही. या सामन्यात दोन्ही संघांतील गोलंदाजांना समान संधी आहे. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. त्याचबरोबर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि पंत यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे खेळपट्टीवर टीका करता येणार नाही."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OvTGmK

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...