चेन्नई, : भारतासाठी दुसरा कसोटी सामना फार महत्वाचा असेल. कारण भारताने हा सामना जिंकला तर त्यांना मालिकेत १-१ अशी बरोबरी करता येऊ शकते. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात कोणते महत्वाचे बदल होऊ शकतात, पाहा... भारतीय संघात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी काही महत्वाचे बदल होऊ शकतात. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघातून फिरकीपटू शाहबाझ नदीमला वगळण्यात येऊ शकते. पण नदीमला वगळल्यावर कोणाला संधी द्यायची, याचा विचार भारतीय संघाला करावा लागणार आहे. कारण पहिल्या कसोटीत कुलदीव यादवला संधी दिली नव्हती आणि त्यामुळे संघावर जोरदार टीका झाली होती. त्याचबरोबर पहिल्या सामन्यासाठी निवडण्यात आलेला अक्षर पटेलही आता फिट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत नदीमला वगळल्यावर कुलदीपला संधी द्यायची की अक्षरला, याचा निर्णय भारतीय संघाला घ्यावा लागले. भारतीय संघाकडे अजून एक फिरकीपटूचा आहे पर्याय...चेन्नईची खेळपट्टी ही पहिल्या दिवसापासून जर फिरकीला मदत करणारी असेल तर कोणत्या गोलंदाजाला खेळवायचे, हा सर्वात महत्वाचा प्रश्न असेल. दुसऱ्या कसोटीमध्ये जर इंग्लंडच्या संघाला धक्का द्यायचा असेल तर भारतीय संघ फिरकीपटू राहुल चहरलाही संधी देऊ शकतो. कारण चर्चेमध्ये सध्याच्या घडीला कुलदीप यादव आहे. पण कुलदीपचे चेंडू आतमध्ये येतात आणि त्याप्रकारची फिरकी गोलंदाजी आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरही करतात. त्यामुळे भारतीय फिरकी गोलंदाजीमध्ये जर विविधता आणायची असेल, तर राहुल चहरलाही यावेळी संधी दिली जाऊ शकते. जसप्रीत बुमराला विश्रांती देणार का... बुमराला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण ऑस्ट्रेलियामध्ये बुमराला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला चेन्नईमध्ये खेळवण्यात आले. पम जर खेळपट्टी फिरकीला जास्त मदत करणारी असेल, तर बुमराला खेळवण्याचा जास्त फायदा होणार नाही. त्याचबरोबर या वर्षी महत्वाच्या स्पर्धाही होणार आहेत. त्यासाठी बुमराला फिट ठेवायचे असेल, तर त्याला विश्रांती द्यायला हवी, असे म्हटले जात आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aRnRMS
No comments:
Post a Comment