Ads

Wednesday, February 10, 2021

IND vs ENG : मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूंला भारतीय संघात मिळू शकते स्थान, अशी फिरू शकतात चक्र...

चेन्नई, : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात मुंबई इंडियन्सच्या एका क्रिकेटपटूला भारतीय संघात स्थान मिळू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संघाला जर आपल्या गोलंदाजीमध्ये विविधता आणायची असेल तर मुंबई इंडियन्सच्या राहुल चहरला भारतीय संघात स्थान मिळू शकते. कारण चेन्नईची खेळपट्टी ही दुसऱ्या कसोटीसाठी फिरकी गोलंदाजीला पोषक बनवण्यात आली आहे. भारताकडे सध्याच्या घडीला आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, शाहबाझ नदीम आणि राहुल चहर असे पर्याय उपलब्ध आहेत. कशी फिरू शकतात चक्र, पाहा.... आर. अश्विन आणि सुंदर हे दोघेही ऑफ स्पिनर आहेत. त्याचबरोबर कुलदीपचे चेंडूही ऑफ स्पिनरसारखे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आतमध्ये येतात. त्यामुळे गोलंदाजी वैविध्य आणण्यासाठी नदीमला पहिल्या कसोटीत संधी देण्यात आली होती. पण या संधीचे सोने नदीनला करता आले नाही. त्यामुळे नदीमला आता दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. राहुल चहर हा लेग स्पिनर आहे. त्याचे चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर निघतात. त्यामुळे जर चहरला संघात स्थान दिले तर फिरकी गोलंदाजीमध्ये विविधता येऊ शकते. त्यामुळे अशी विचारांनी चक्र भारतीय संघ व्यवस्थापनाची फिरू शकतात, असे म्हटले जात आहे. चेन्नईच्या मैदानात पहिले दोन कसोटी सामने होणार आहेत. पहिल्या कसोटी सामन्यासाठी बनवण्यात आलेल्या खेळपट्टीवर जास्त पाणी टाकण्यात आले होते. त्याचबरोबर रोलरही मारण्यात आला होता. त्यामुळे ही खेळपट्टी पाटा झाली होती. त्यावर गोलंदाजांना पहिल्या दोन दिवसांमध्ये कोणतीच मदत मिळत नव्हती. पण दुसऱ्या कसोटीसाठी बनवण्यात आलेल्या खेळपट्टीवर पाणी टाकणे बंद केले आहे. त्यामुळे आता उन्हाचा जास्त परीणाम खेळपट्टीवर होईल. त्यामुळे खेळपट्टीवरील माती लवकर बाहेर येईल आणि त्यामुळे फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल. दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसापासूनच फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची दाट शक्यता आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jBUQbP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...