Ads

Saturday, February 13, 2021

IND vs ENG : रोहित आणि अजिंक्यच्याबाबतीत तिसऱ्या पंचांचे निर्णय ठरले वादग्रस्त, पाहा काय आहे सत्य...

चेन्नई, : रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी आजचा दिवस गाजवला. पण त्याचबरोबर रोहित आणि अजिंक्य यांच्याबाबतीतले तिसऱ्या पंचांनी दिलेले दोन निर्णय चांगलेच वादग्रस्त ठरले आहेत. या वादग्रस्त निर्णयांबाबतचं सत्य नेमकं काय आहे, पाहा... सामन्याच्या ७१व्या षटकात जॅक लिचच्या गोलंदाजीचा सामना करत असताना रोहित फसला. त्यामुळे चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि त्याने स्टम्पिंग केले. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने जोरदार अपील केली. त्यावेळी मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. त्यावेळी व्हिडीओमधील फुटेजमध्ये असे पाहायला मिळाले की, रोहितचा पाय हा जेव्हा स्टम्प उडवण्यात आले होते. तेव्हा क्रीझच्या लाइनवर होता. जर फलंदजाचा पाय लाईनवर असेल तर त्याला बाद देण्यात येते. पण तिसरे पंच अनिल शर्मा यांनी रोहितला यावेळी नाबाद दिले. अजिंक्य रहाणेाबबतचा असाच एक तिसऱ्या पंचांना निर्णय वादग्रस्त ठरला. ही गोष्ट घडली तर ७५व्या षटकात. त्यावेळी जॅक लिचच्या गोलंदाजीचा सामना करत असताना अजिंक्य चकला. त्यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. त्यावेळी मैदानातील पंचांनी अजिंक्यला नाबाद ठरवले होते. त्यावेळी इंग्लंडच्या संघाने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला होता. तिसऱ्या पंचांनी यावेळी अजिंक्यची बॅट चेंडूला लागली की नाही, ते पहिल्यांदा तपासले. त्यावेळी अजिंक्यची बॅट ही चेंडूला लागलेली नव्हती. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी यावेळी पायचीतसाठी केले अपील तपासण्यासाठी गेले, त्यावेळी चेंडू हा लेग स्टम्पच्या बाहेर जात असल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी यावेळी अजिंक्य नाबाद असल्याचे सांगितले आणि मैदानावरील पंचांना आपला निर्णय कायम ठेवण्यास सांगितले. त्यावेळी इंग्लंडचे खेळआडू चांगलेच वैतागलेले होते. कारण त्यावेळी चेंडू हा अजिंक्यच्या ग्लोव्हजला लागला होता, असे इंग्लंडच्या खेळाडूंचे म्हणणे होते. त्यामुळे अजिंक्य हा पायचीत नाही तर झेलबाद झाला असल्याचे इंग्लंडचे खेळाडू मैदानावरील पंचांना सांगत होते. पण त्यावेळी तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय देऊन झाला होता आणि त्यामुळेच इंग्लंडच्या संघाला दाद मागण्याचा अधिकार उरला नव्हता. पण त्यानंतर ही गोष्ट पंचांच्या लक्षात आली. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला यावेळी त्यांचा रीव्ह्यू पुन्हा देण्यात आला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qkr7Xt

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...