Ads

Monday, February 15, 2021

IND vs ENG : तिसऱ्या पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर कोहली आणि शास्त्री भडकले, व्हिडीओ झाला व्हायरल...

चेन्नई, : तिसऱ्या दिवशीही तिसऱ्या पंचांचा निर्णय वादग्रस्त ठरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तिसऱ्या पंचांवर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे दोघेही चांगलेच भडकले होते. कारण या एका गोष्टीमुळे इंग्लंडच्या जो रुटला जीवदान मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही गोष्ट अक्षर पटेलच्या तिसऱ्या षटकात घडली. त्यावेळी अक्षरच्या चेंडूचा सामना रुट करत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भारतीय खेळाडूंनी रुट हा झेल बाद झाला आहे, अशी जोरदार अपील केली. पण मैदानातील पंचांनी ही अपील फेटाळली. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी बराच विचार केला आणि त्यानंतर डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी यावेळी व्हिडीओ पाहायला सुरुवात केली. त्यावेळी चेंडू कुठेही बॅटला लागला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रुट हा झेल बाद झाला नसल्याचे तिसऱ्या पंचांनी सांगितले. त्यानंतर रुट पायचीत बाद आहे की नाही, याची निर्णय घ्यायला तिसऱ्या पंचांनी सुरुवात केली. त्यावेळी चेंडू हा ऑफ स्टम्पच्या बाहेर पडला होता. पण चेंडू स्टम्पच्या लाईनमध्ये पॅडला लागला होता. त्यामुळे चेंडू थेट स्टम्पवर जात असल्याचे पाहायला मिळाले. पण त्यावेळी तिसऱ्या पंचांनी फक्त झेल बादसाठी विचारले होते. त्यामुळे या चेंडूचा इम्पॅक्ट दाखवत असताना त्यांनी पंचांचा निर्णय असल्याचे दाखवले. पण जर तिसरा पंच ही गोष्ट पाहत असेल तर त्यांनी मैदानातील पंचांना याबाबत विचारायला हवे होते. पण तसे झालेले दिसले नाही. रुट हा पायचीत होत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत होते. पण पंचांनी त्याला नाबाद ठरवले. त्यामुळे कोहली यावेळी या निर्णयावर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला होता. कारण तिसऱ्या पंचांनी पायचीतचा योग्य निर्णय द्यायला हवा, असे त्याचे म्हणणे होते. यावेळी कोहली बराच वेळ मैदानातील पंचांशी वाद घालत असल्याचे पाहायला मिळाले. पण मैदानातील पंचांनी कोहलीचे ऐकून घेतले नाही. हा सर्व प्रकार घडत असताना भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही कॅमेरा मारण्यात आला होता. तेव्हा शास्त्रीदेखील या निर्णयावर चांगलेच वैतागलेले पाहायला मिळाले. त्यामुळे सामना संपल्यावर जेव्हा पंच मैदानाबाहेर जात होते तेव्हा शास्त्री यांनीदेखील पंचांना याबाबत विचारल्याचे पाहायला मिळाले. सलग तिसऱ्या दिवशी पंचांना निर्णय वादग्रस्त ठरल्याचे यावेळी पाहायला मिळाले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jQEMTE

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...