Ads

Saturday, February 13, 2021

IND vs ENG : क्लीन बोल्ड झाल्यानंतरही विराट कोहली मैदानातच उभा राहीला, जाणून घ्या कारण...

चेन्नई, : भारताचा कर्णधार विराट कोहली हा दुसऱ्या सामन्यात शून्यावर क्लीन बोल्ड झाला. पण आऊट झाल्यानंतरही कोहलीने मैदान सोडले नाही आणि तो खेळपट्टीवरच उभा राहिल्याचे पाहायला मिळाले. मोईन अलीच्या दुसऱ्या चेंडूवर विराट क्लीन बोल्ड झाला. कोहलीला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. चेंडू नेमका कसा आला आणि तो स्टम्पवर कसा आदळला, हे कोहलीला यावेळी समजलेच नाही. त्याचमुळेच क्लीन बोल्ड झाल्यानंतरही तो खेळपट्टीवरच उभा राहीला आणि त्याने समोर उभ्या असलेल्या रोहित शर्माला विराचले की, नेमके काय घडले. आपण क्लीन बोल्ड झालो आहोत, यावर कोहलीचा विश्वासच बसला नव्हता. ही गोष्ट घडली ती मोईन अलीच्या २२व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर. यावेळी चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर पडला आणि तो थेट स्टम्पमधअये घुसला. चेंडू स्टम्पच्या वरच्या भागावर आदळला आणि कोहली क्लीन बोल्ड झाला. कोहली त्यानंतर खेळपट्टीवर उभा राहीला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी हा चेंडू पाहिला आणि कोहली आऊट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतरच कोहलीने मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताला यावेळी चांगली सुरुवात मिळाली नाही. कारण भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल हा शून्यावर आऊट झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराला जास्त धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कोहलीला फक्त पाच चेंडूच खेळता आले आणि एकही धाव न करता तो बाद झाला. त्यामुळे विराटलअजूनही चांगला फॉर्म गवसलेला नसल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना रोहित शर्मा मात्र धडाकेबाज फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले होते. रोहितने यावेळी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रोहितने जलदगतीने धावा केल्यामुळेच भारताला लंचपूर्वी शतक पूर्ण करता आले होते. त्यामुळे आता रोहित चांगल्या फॉर्मात आला असून तो किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Ov5u8R

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...