Ads

Wednesday, February 10, 2021

IND vs ENG : भारताला जिंकायचे असेल तर ही एक गोष्ट करायलाच हवी, सुनील गावस्करांचा फॉर्म्युला...

चेन्नई, : इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात तर भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता दुसरा कसोटी सामना जर भारताला जिंकायचा असेल, तर त्यांनी नेमकं काय करायला हवं, याचा फॉर्म्युला भारताचे माजी महान क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी सांगितला आहे. याबाबत गावस्कर म्हणाले की, " माझ्यामते दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात बदल होतील. दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवला संधी द्यायला हवी, पण त्यासाठी नदीम किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला वगळावे लागेल. पण भारतीय संघाला पहिल्या सामन्यातील एक चुक सुधारावी लागेल. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाला कमी धावसंख्येवर बाद करायला हवे. कारण पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने भरपूर धावा केल्या होत्या आणि त्याचाच त्यांना फायदा झाला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला कमी धावसंख्येत कसे रोखता येईल, हे भारतीय संघाने पाहायला हवे." कुलदीप यादवबाबत गावस्कर म्हणाले... सुनील गावस्कर याबाबत म्हणाले की, " दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात बदल करायला हवा. दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला संधी द्यायला हवी, असे मला वाटत आहे. संघामध्ये आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन फिरकीपटू आहेत. अश्विनहा चेंडू हवेत संथगतीने सोडतो, तर सुंदर अश्विनपेक्षा जास्त वेगात चेंडू सोडतो. त्यामुळे जर कुलदीपला संघात स्थान दिले तर नक्कीच गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळेल." वॉशिंग्टन सुंदरबाबत गावस्कर काय म्हणाले, पाहा...सुनील गावस्कर पुढे म्हणाले की, " भारतीय संघातून सुंदरला वगळणे हे खूप कठिण आहे. कारण ब्रिस्बेनमध्ये सुंदरने दमदार कामगिरी केली होती. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात सुंदरने ८५ धावाही केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीसाठी कोणाला संघातून वगळायचे, हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा असेल. नदीम की सुंदर यांच्यापैकी कोणाला विश्रांती द्यायची, हे त्यांना ठरवावे लागेल. पण कुलदीपला दुसऱ्या कसोटीत स्थान द्यायला हवे, असे मला वाटते."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jz3B6y

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...