Ads

Friday, February 12, 2021

तुम्हाला मसाला मिळणार नाही; कर्णधारपदावरून रहाणेने दिले सडेतोड उत्तर

चेन्नई: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघातील दुसरी कसोटी चेन्नईत उद्यापासून सुरू होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ऑनलाइन पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. वाचा- पहिल्या कसोटीत भारतीय खेळाडूंची बॉडी लॅग्वेज योग्य नव्हती असे अजिंक्य म्हणाला. प्रत्येक वेळी एकाच प्रकारच्या एनर्जीने मैदानावर उतरता येत नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय खेळाडूंमध्ये ही एनर्जी कमी दिसली. विराट कोहलीकडे पुन्हा संघाचे नेतृत्व आले म्हणून असे झाले नाही. विराट कोहलीच आमचा कर्णधार आहे आणि तोच राहणार. तुम्हाला काहीही मसाला मिळणार नाही. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा २२७ धावांनी पराभव झाला होता. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वावर आणि संघ निवडीवर टीक झाली होती. भारताला विजयासाठी ४२० धावांचे लक्ष्य होते, पण त्यांना १९२ धावा करता आल्या. विराटने दुसऱ्या डावात अर्धशतक केले. मात्र अन्य फलंदाज अपयशी ठरले. पराभवानंतर अनेकांनी पुन्हा एकदा कसोटी संघाचा कर्णधार बदला अशी चर्चा सुरू केली. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा झालेला हा सलग चौथा पराभव आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंड दोन आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिविरुद्ध पहिल्या आणि मग आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा पराभव झालाय. वाचा- अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नसताना ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. त्यामुळे अजिंक्यला कर्णधार करण्याची मागणी अनेकांनी केली होती. पण अजिंक्यला या गोष्टीत रस नाही. त्यामुळेच त्यांने पत्रकार परिषदेत भारतीय संघाच्या नेतृत्वावरून कोणत्याही प्रकारचा मसला मिळणार नाही, असे स्पष्ट करून सर्वांना गप्प केले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jPQ1vS

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...