चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईत दुसरा कसोटी सामना सुरू आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा भारताने इंग्लंडच्या चार फलंदाजांना फक्त ३९ धावांवर माघारी पाठवले होते. यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटचा देखील समावेश आहे. भारताने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या आहेत. वाचा- दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने ६ बाद ३०० धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. टीम इंडियाने अखेरच्या चार विकेट फक्त २९ धावात गमावल्या. ऋषभ पंतने नाबाद ५८ धावा केल्या. भारतीय संघाने केलेल्या ३२९ धावात एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. वाचा- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात कोणतीही अतिरिक्त धाव न घेता झालेल्या या सर्वाधिक धावा आहेत. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या एकही अतिरिक्त धाव दिली नाही. कसोटीत अतिरिक्त धाव न घेता करण्यात आलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. याआधी पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध १९५४-५५ साली लाहोर येथे झालेल्या कसोटीत ३२८ धावा केल्या होत्या. तेव्हा भारताने एकही अतिरिक्त धाव दिली नव्हती आणि पाकने ३२८ धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाचा हा विक्रम ६६ वर्षानंतर आज भारताने मोडला. वाचा- अतिरिक्त धाव न देता सर्वाधिक धावा करणारे संघ भारत ३२९ धावा विरुद्ध इंग्लंड (२०२०-२१) पाकिस्तान ३२८ धावा विरुद्ध भारत (१९५४-५५) दक्षिण आफ्रिका २५२ धावा विरुद्ध इंग्लंड (१९३०-३१) दक्षिण आफ्रिका २४७ धावा विरुद्ध इंग्लंड (१९६०) वाचा- भारतीय संघाने रोहित शर्मा (१६१), अजिंक्य रहाणे (६७) आणि ऋषभ पंत (नाबाद ५८) यांच्या जोरावर पहिल्या डावात ३२९ धावा केल्या. चार सामन्यांच्या कसोटीत इंग्लंडने १-० असा आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ZgHs3y
No comments:
Post a Comment