Ads

Monday, January 18, 2021

IND vs AUS : वडिलांच्या निधनानंतर मी कोणामुळे सावरलो, मोहम्मद सिराजने केला खुलासा...

ब्रिस्बेन, : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण सिराज ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पोहोचला असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. सिराजसाठी हा मोठा हादरा होता. पण यामधून सिराज सावरला आणि त्याने मैदानात उतरून नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली. वडिलांच्या निधनानंतर आपण कोणामुळे सावरलो, याचा खुलासा आता सिराजने केला आहे. सिराज आयपीएल खेळून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये सराव करत असतानाच सिराजला एक वाईट बातमी समजली. आतापर्यंत जे सिराजच्या पाठी ठामपणे उभे असलेल्या वडिलांचे निधन झाले होते. सिराज यावेळी पूर्णपणे खचून गेला होता. पण यानंतर सिराज पुन्हा एकदा सर्व गोष्टी बाजूला सारून उभा राहिला आणि भारताचे नाव त्याने उंचावले. याबाबत सिराज म्हणाला की, " माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी भारताकडून खेळावे. त्यांची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे, पण हे पाहण्यासाठी ते आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकलो, याचा आनंद आहे. आजच्या दिवशी मी पाच विकेट्स मिळवल्या आणि संघाच्या कामी आलो. ही कामगिरी नेमकी कशी होती, हे शब्दांत मला वर्णन करून सांगता येणार नाही." सिराज पुढे म्हणाला की, " वडिलांच्या निधनानंतर मी पूर्णपणे खचून गेलो होता. पण त्यानंतर मला आत्मविश्वास दिला तो माझ्या आईने. वडिलांच्या निधनानंतर मी आईबरोबर संवाद साधला. आईने मला मानसीकरीत्या खंबीर बनवले. त्याचबरोबर वडिलांचे स्वप्न तू पूर्ण करू शकतोस, असेही तिने मला सांगितले. आईशी बोलल्यानंतर मी मानसीकदृष्ट्या कणखर झालो आणि याच गोष्टीचाच फायदा मला ऑस्ट्रेलिाच्या दौऱ्यात झाला." सिराजच्या भेदक माऱ्यामुळेच ऑस्ट्रेलियाला यावेळी तिनशे धावांचा पल्लाही गाठता आला नाही. सिराजने यावेळी स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि मॅथ्यू वेड या तिघांना बाद करत ऑस्ट्रेलियाची मधळी फळी खिळखिळी करून टाकली. त्याचबरोबर अन्य दोन फलंदजांना बाद करत सिराजने पहिल्यांदाच कसोटी मालिकेत पाच विकेट्स मिळवण्याचा पराक्रम केला आहे. सिराजने यावेळी भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथचा २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढल्याचेही पाहायला मिळाले आहे. सिराजने आतापर्यंत यया मालिकेत १३ बळी मिळवण्याची किमया साधली आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीनाथच्या नावावर होता. श्रीनाथने १९९१ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात आपल्या नावावर १० विकेट्स मिळले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2XP25Dt

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...