Ads

Wednesday, February 10, 2021

Virat Kohli Captaincy Controversy: तेव्हा कर्णधार बदलण्यावर चर्चा करू...

नवी दिल्ली: कर्णधार म्हणून सलग चार कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर ()वर पुन्हा एकदा टीका सुरू झाली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी कर्णधार बदला अशी चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियात विराट नसताना अजिंक्य रहाणेने विजय मिळून दिला होता. विराटच्या कर्णधारपदाबाबत भारतयी संघाचे माजी निवड समितीप्रमुख () यांनी त्यांचे मत दिले आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून वाद घालण्याची ही योग्य वेळ नाही. मोरेंच्या मते महेंद्र सिंह धोनी प्रमाणेच विराट कोहलीला देखील माहिती आहे की कर्णधारपद कधी सोडायचे. चेन्नईत इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला. टीम इंडियाने चार वर्षात प्रथमच घरच्या मैदानावर कसोटीत पराभव स्विकारला. अखेरच्या दिवशी इंग्लंडने भारतावर २२७ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा सलग चौथा पराभव आहे. याआधी भारताने न्यूझीलंडमध्ये दोन तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एडिलेड कसोटीत पराभव स्विकारला होता. वाचा- विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना तेव्हा संधी मिळाली जेव्हा भारताचा एडिलेड कसोटीत पराभव झाला आणि त्यानंतर अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले. रहाणेने तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवून दिला आणि एक सामना ड्रॉ केला. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर विराटवर होणाऱ्या टीकेवर बोलताना किरण मोरे म्हणाले, ही योग्य वेळ नव्हे. विराट आपला सर्वोत्तम खेळाडू आहे. कर्णधारपदावर वाद घालणे हे थोडे घाईचे ठरेल. त्याला माहिती आहे की कधी नेतृत्व सोडायचे. धोनीने देखील असेच केले होते. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका जिंकल्या आहेत. आपली सर्व ऊर्जा पुढील कसोटी मालिका जिंकण्यासाठी वापरली पाहिजे. वाचा- कोणत्याही कर्णधाराला कसोटीत पराभूत होण्याची इच्छा नसते. सलग चार कसोटीत पराभव झाल्यानंतर विराटवर देखील दबाव असेल. तो देखील याचा विचार नक्कीच करत असणार. माझ्या मते भारतीय संघाने कर्णधार बदलण्याचा विचार करू नये. पुढील सामन्यात पराभव झाला तर आपल्यावर दबाव आणखी वाढेल. तेव्हा कर्णधारपदाबाबत चर्चा होऊ शकते. विराट भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात ५७ पैकी ३३ मध्ये विजय १४ मध्ये पराभव तर १० सामने ड्रॉ झाले आहेत. त्यानंतर धोनीचा क्रमांक येतो. धोनीच्या नेतृत्वात ६० पैकी २७ मध्ये विजय मिळवला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2N8v9Ue

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...