Ads

Tuesday, February 16, 2021

IND vs ENG : पहिल्या पराभवानंतर भारताने दुसरा विजय कसा मिळवला, कोहलीने सांगितले रहस्य

चेन्नई, : पहिल्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला. पहिल्या पराभवानंतर भारताने कसा विजय मिळवला, याचे रहस्य कर्णधार विराट कोहलीने सामना संपल्यावर सांगितले. कोहली म्हणाला की, " पहिल्या सामन्यात आम्हाला पराभव पत्करावा लागला होता. पण त्यामुळे आम्ही निराश झालो नव्हतो. तो पराभव आम्ही विसरलो आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या कसोटी सामन्याचा विचार करायला सुरुवात केली होती. दुसऱ्या सामन्यात काय रणनिती आखायची, याचाच विचार आम्ही करत होतो. सर्व खेळाडूंनी चांगले योगदान दिले, त्यामुळेच आम्हाला हा विजय मिळवता आला आहे." कोहली पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. त्याबद्दल कोहली म्हणाला की, " पहिल्या डावात खेळताना माझ्याकडून चुक झाली होती. पण ही चुक मी तात्काळ सुधारण्याचा निर्णय मी घेतला होता. दुसऱ्या डावात खेळताना मी त्या चुका टाळल्या. त्यामुळे मला दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करता आली. त्याचबरोबर दुसऱ्या डावात अश्विनबरोबर झालेली भागीदारीही महत्वाची ठरली." याच मैदानावर इंग्लंडने पहिल्या कसोटीत २२७ धावांनी विजय मिळवला होता. आता त्याच मैदानावर भारताने त्याच्यापेक्षा मोठा विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. इंग्लंड समोर ४२९ धावांचे अशक्य असे लक्ष होते तर भारताला विजयासाठी फक्त ७ विकेटची गरज होती. इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावांवर संपुष्ठात आला. भारतीय संघाच्या या विजयाचा हिरो ठरला तो अश्विन पहिल्या डावात पाच, दुसऱ्या डावात ३ विकेट आणि शतकासह त्याने विजयाच महत्त्वाची भूमिका पार पाडली. तर अक्षर पटेलने पदार्पणात पाच विकेट घेतल्या. अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी मोठा विजय मिळवला. त्यामुळे भारताने आता मालिकेत १-१ अशीबरोबरी केली आहे. या गोष्टीचा फायदा भारतीय संघाला नक्कीच तिसऱ्या कसोटी सामन्यात होऊ शकतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qpcfY7

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...